शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

रेडी पंचक्रोशीत नवीन प्रकल्प आणा

By admin | Updated: November 15, 2015 23:56 IST

कामगारांची मागणी : दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले; टाटा मेटॅलिक्स प्रकल्प पुन्हा सुरू करा

शिरोडा : रेडी येथील बंद अवस्थेत असलेल्या टाटा मेटॅलिक्स प्रकल्पाच्या जागी स्थानिक कामगारांना पुन्हा रोजगार उपलब्ध होईल, असा एखादा प्रकल्प आणावा किंवा टाटा मेटॅलिक्स प्रकल्प पुन्हा सुरू व्हावा, यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न व्हावेत. जेणेकरून रेडी पंचक्रोशीत स्थानिक कामगारांना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे टाटा मेटॅलिक्सच्या बेकार झालेल्या कामगारांनी केली आहे. पालकमंत्री केसरकर शिरोडा दौऱ्यावर आले असता याबाबतचे निवेदन देण्यात आले.माजी केंद्रीय अर्थमंत्री मधू दंडवते यांच्या प्रयत्नाने १९९० मध्ये जिल्ह्यातील रेडी गावात उषा इस्पात नावाने पीग आयर्न प्रकल्प आणला गेला. या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार मिळेल, आपल्या भागाचा विकास होईल, या विचाराने गावातील जमीनदारांनी अल्प मोबदल्यात आपल्या जमिनी प्रकल्प सुरू करण्यासाठी दिल्या. प्रकल्प सुरू झाल्यावर स्थानिक १५०० जणांना कायमस्वरूपी, तर ५०० जणांना कंत्राटी स्वरूपाचे काम मिळाले. साधारण १४ वर्षे अनेक समस्यांना तोंड देत हा प्रकल्प सुरू होता. परंतु कंपनीच्या गलथान कारभारामुळे प्रकल्प बंद पडून २००५ मध्ये याचा लिलाव करण्यात आला. लिलावात हा प्रकल्प कोलकात्यातील नामांकित मे. टाटा मेटॅलिक्स लिमिटेडने खरेदी केला. उषा कंपनीची सर्व मालमत्ता या कंपनीने घेतली. पण सर्व कामगारांना कामावर न घेता काही कामगारांनाच पुन्हा नव्याने कमी पगारावर कामावर ठेवले. उषा कंपनीकडून काहीच नुकसानभरपाई न मिळाल्याने व सर्वांनाच काम न मिळाल्याने अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तरीही गावच्या विकासाच्या अपेक्षेने स्थानिक कामगार व नेत्यांनी फारसा विरोध केला नाही. २००५ ते ११ या कालावधीत टाटा कंपनीने हा प्रकल्प व्यवस्थित चालविला; पण कच्च्या मालाचा तुटवडा, राज्य शासनाची न मिळालेली परवानगी आणि तत्कालीन राज्य सरकारची उदासीनता यामुळे प्रकल्पाचे उत्पादन बऱ्याच प्रमाणात कमी होऊन अखेर मार्च २०१३ मध्ये कामगारांना नाममात्र नुकसानभरपाई देऊन प्रकल्प बंद केला. यामुळे पुन्हा एकदा सर्वांवर बेकारीचे संकट आले. हा प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची सुतरामही शक्यता नाही. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेला कामगारवर्ग शेतकऱ्यांप्रमाणे कर्जबाजारी होण्याची भीती निर्माण होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत हा प्रकल्प पुन्हा सुरू करावा; अन्यथा दुसरा कोणताही प्रकल्प सिंधुदुर्गात येण्यासाठी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी कामगारांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र व गोवा सीमेवर टाटा मेटॅलिक्सच्या मोकळ्या जागेत पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत असल्याबाबत बातमीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री केसरकर शिरोडा शिवसेना शाखेत आले होते. यावेळी त्यांनी टाटा मेटॅलिक्सच्या जागेवर सामान्य कामगारांनाही रोजगार उपलब्ध करून देणारा प्रकल्प येणार असून, लवकरच प्रकल्प सुरू करण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, प्रकाश परब, तालुकाप्रमुख सुरेश नाईक, शाखाप्रमुख रोहित परब, विलास रगजी, राजन गावडे, पंचायत समिती सदस्य उमा मठकर, सरपंच विशाखा परब, विभागप्रमुख सचिन परब, संतोष मांजरेकर व शिवसैनिक उपस्थित होते.लवकरच निर्णय घेऊ: सुभाष देसाईटाटा मेटॅलिक्सच्या बेकार कामगारांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, सिंधुदुर्गात रोजगार उपलब्ध करून देणारा प्रकल्प आणण्याबाबत तसेच रेडी येथील टाटा मेटॅलिक्सच्या मोकळ्या जागेत प्रकल्प सुरू करण्याबाबत शासन गंभीर आहे. आपण व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात याबाबत बैठका-चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.