शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोगिल खुर्दला रेंजमध्ये आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:25 IST

विजय कदम : कणेरी : कोल्हापूर शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरवर असणारे कोगिल खुर्द हे गाव मोबाईलचे नेटवर्क मिळत ...

विजय कदम :

कणेरी : कोल्हापूर शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरवर असणारे कोगिल खुर्द हे गाव मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने संपर्कहीन झाले आहे. मोबाईल असूनही येथील ग्रामस्थांना कोणाशीच संपर्क करता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरापासून जवळ असणाऱ्या या गावात मोबाईलचे टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.

कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ असणाऱ्या कोगिल खुर्दची १५०० च्या आसपास लोकसंख्या आहे. हे गाव डोंगरावरती वसले असले आहे. गावात प्रवेश केला की मोबाईलची रेंज गायब होते. त्यामुळे ग्रामस्थांचा इतरांशी संपर्क तुटतो. ग्रामस्थांना नातेवाईकांना संपर्क करावयाचा झाल्यास कंदलगाव किंवा गिरगाव हद्दीत जावे लागते. बहुतांश जणांकडे मोबाईल असूनही नेटवर्क मिळत नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे कोगिल खुर्दमध्ये मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.