शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जनहिताच्या विरोधातील सरकारला वठणीवर आणा

By admin | Updated: July 3, 2016 21:25 IST

हसन मुश्रीफ : यमगे येथे शेतकरी मेळावा, सत्कार समारंभ, पाणीपूजन कार्यक्रम

मुरगूड : अच्छे दिन आणण्याच्या नावाखाली सत्तेवर आलेले भाजपचे सरकार विविध शासकीय योजना धडाधड रद्द करत आहे. सर्वसामान्यांना मिळणारे केरोसिन, स्वस्त धान्य, आरोग्य सेवा, बांधकाम कामगारांच्या योजना, आदींना खो घालून या भाजप सरकारने आपण जनहिताच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे सरकारला उलथून टाकण्यास जरी अवधी असला, तरी आंदोलनाच्या माध्यमातून वठणीवर आणण्यासाठी जनतेने सज्ज राहावे, असे आवाहन माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. यमगे (ता. कागल) येथे हसन मुश्रीफ फौंडेशनच्या माध्यमातून मारलेल्या तीन कूपनलिकांचे पाणीपूजन तसेच मान्यवरांचा सत्कार सोहळा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बिद्री’चे माजी संचालक शंकरराव पाटील होते. यावेळी यमगे गावासाठी मुश्रीफ यांनी निधी दिल्याबद्दल उपसरपंच मारुती पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दहावीमध्ये मुरगूड केंद्रात पहिला आलेला आशुतोष विभूते, सायली कांदळकर व बिरदेव डोणे यांचा सत्कार मुश्रीफांच्या हस्ते पार पडला. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शामराव पाटील यांनी स्वागत केले, तर माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, सरपंच सुजाता पाटील, शंकरराव किल्लेदार, माजी उपसरपंच अशोक हुल्ले, मोहन किल्लेदार, चंद्रकांत कांदळकर, बी. के. साठे, राजू सावंत, हरिभाऊ कुंभार, मुरगूड बँकेचे संचालक साताप्पा पाटील, रणजित पाटील, दत्ता पाटील, शोभा गुरव, परशराम डोणे, विजया कुंभार, संदीप पाटील, तानाजी कुंभार, आदी प्रमुख उपस्थित होते. जहाँगीर नायकवडी यांनी आभार मानले.