शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

साळवण येथील नदीवरील पुलाची दुरवस्था

By admin | Updated: January 8, 2015 00:03 IST

बांधकाम खात्याचे दुर्लक्ष : तत्काळ डागडुजी करण्याची मागणी

साळवण : साळवण  - (ता. गगनबावडा) येथील सरस्वती पुलाची दुरवस्था झाली असून, डागडुजीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.गगनबावडा-कोल्हापूर राज्य मार्गावर साळवण येथे सरस्वती नदीवर १९५८ मध्ये पुलाचे बांधकाम झाले आहे. यापूर्वी कोल्हापूरहून साळवणपर्यंत व गगनबावड्याहून साळवणपर्यंत एस.टी. येत असे. प्रवाशांना होडीतून पलीकडे जाऊन एस.टी.चा प्रवास करावा लागत होता. पुलाची लांबी ५३ मीटर आहे. प्रत्येकी १७ मीटर अंतरावर असे एकूण तीन गाळे आहेत. या पुलामुळे कोकणात जाणारा नजीकचा मार्ग म्हणून या मार्गाचा वापर वाहनधारक करतात. या मार्गामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होते. या मार्गावर मोठी वाहतूक सुरू आहे.५७ वर्षे पूर्ण झालेल्या पुलाची मात्र दुरवस्था होऊ लागली आहे. साळवणकडील बाजूला मुख्य नदी प्रवाहावरच चार ते पाच फूट लांबी-रुंदीचा कठ्ठा तुटला आहे, तर पोलीस चौकीकडील बाजूच्या संरक्षक कठड्याचे दगड निखळले आहेत. दोन्ही बाजूच्या संरक्षक कठड्याचे प्लॅस्टर उखडले आहे. मुख्य पुलाच्या दोन्ही बाजूला सुमारे पंधरा ते वीस फूट अंतरात सिमेंटचे खांब व त्यातून लोखंडी पाईप असून, या सर्व लोखंडी पाईप गंजून गेल्या आहेत. पाईप तुटून जमिनीवर पडल्या आहेत. परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्यामुळे वाहतुकीत भर पडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पडझडीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)