शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

साळवण येथील नदीवरील पुलाची दुरवस्था

By admin | Updated: January 8, 2015 00:03 IST

बांधकाम खात्याचे दुर्लक्ष : तत्काळ डागडुजी करण्याची मागणी

साळवण : साळवण  - (ता. गगनबावडा) येथील सरस्वती पुलाची दुरवस्था झाली असून, डागडुजीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.गगनबावडा-कोल्हापूर राज्य मार्गावर साळवण येथे सरस्वती नदीवर १९५८ मध्ये पुलाचे बांधकाम झाले आहे. यापूर्वी कोल्हापूरहून साळवणपर्यंत व गगनबावड्याहून साळवणपर्यंत एस.टी. येत असे. प्रवाशांना होडीतून पलीकडे जाऊन एस.टी.चा प्रवास करावा लागत होता. पुलाची लांबी ५३ मीटर आहे. प्रत्येकी १७ मीटर अंतरावर असे एकूण तीन गाळे आहेत. या पुलामुळे कोकणात जाणारा नजीकचा मार्ग म्हणून या मार्गाचा वापर वाहनधारक करतात. या मार्गामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होते. या मार्गावर मोठी वाहतूक सुरू आहे.५७ वर्षे पूर्ण झालेल्या पुलाची मात्र दुरवस्था होऊ लागली आहे. साळवणकडील बाजूला मुख्य नदी प्रवाहावरच चार ते पाच फूट लांबी-रुंदीचा कठ्ठा तुटला आहे, तर पोलीस चौकीकडील बाजूच्या संरक्षक कठड्याचे दगड निखळले आहेत. दोन्ही बाजूच्या संरक्षक कठड्याचे प्लॅस्टर उखडले आहे. मुख्य पुलाच्या दोन्ही बाजूला सुमारे पंधरा ते वीस फूट अंतरात सिमेंटचे खांब व त्यातून लोखंडी पाईप असून, या सर्व लोखंडी पाईप गंजून गेल्या आहेत. पाईप तुटून जमिनीवर पडल्या आहेत. परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्यामुळे वाहतुकीत भर पडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पडझडीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)