शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

राजलक्ष्मीनगरातील पूल बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST

राधानगरी व गारगोटी रस्त्यास जोडणाऱ्या वाहतुकीसाठी दुवा म्हणून हा पूल महत्त्वाचा असून दुचाकी, चारचाकी वाहतुकीची मोठी वर्दळी या पुलावरून ...

राधानगरी व गारगोटी रस्त्यास जोडणाऱ्या वाहतुकीसाठी दुवा म्हणून हा पूल महत्त्वाचा असून दुचाकी, चारचाकी वाहतुकीची मोठी वर्दळी या पुलावरून होत असते. त्यामुळे याची दुरुस्ती क्रमप्राप्त आहे.

क्रेशेर चौक ते संभाजीनगर रस्ता नगरोत्थान योजनेअंतर्गत रुंदीकरण करताना साळोखेनगरातून वाहत येणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर पांडुरंगनगरी नजीक दहा वर्षांपूर्वी हा पूल विकसित करण्यात आला. मात्र, पुलाच्या उभारणीनंतर दुसऱ्या वर्षापासून दुरवस्था व्हायला सुरुवात झाली.

उभारण्यात आलेल्या नैसर्गिक पुलावरून पावसाचे पाण्याचे निर्गतिकरण होत नसल्याने प्रतिवर्षी दळवी कॉलनी, शाम हौसिंग सोसायटी, राजलक्ष्मीनगर या मोठ्या नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते. नैसर्गिक नाल्याच्या पात्रालगत अंतराचे नियम धाब्यावर बसवत अतिक्रमणे करण्यात आली असल्याने पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने उभारण्यात आलेल्या पुलावर मोठा ताण पडत असल्याने पूल कमकुवत होत आहे.

पुलानजीकचा रस्तासुद्धा खचू लागला असून संबंधित प्रशासनाने तत्काळ देखभाल दुरुस्ती न केल्यास भविष्यात पूल कधी कोसळेल सांगता येत नाही.

कोट : पुलाच्या दुरुस्तीसंदर्भात प्रशासनास सुचवण्यात आले असून, नुकतीच संबंधित प्रशासनाच्या उपस्थितीत आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह पाहणी करण्यात आली आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहू. -माजी नगरसेविका, दीपा मगदूम, राजलक्ष्मीनगर प्रभाग ७०

चौकट : सुस्त प्रशासन

चार वर्षांपूर्वी आपटेनगर प्रभागातील नैसर्गिक नाल्यावर उभारण्यात आलेल्या पुलाचा भराव पावसाळ्यात वाहून गेल्याने पूल खचला होता. त्यावेळी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी प्रशासनास लेखी निवेदन देऊन सज्जड दम दिला. तरीही पुलाची दुरुस्ती व्हायला दोन वर्षांचा कालावधी गेला. यावरून पुलांच्या दुरुस्तीबाबतीत प्रशासन किती कार्यतत्पर आहे हे सांगायला नको.

फोटो : राजलक्ष्मीनगरातील नैसर्गिक नाल्यावर पांडुरंगनगरी येथे बांधण्यात आलेल्या पुलाची प्रचंड दुरवस्था झाली असून हा पूल कधी कोसळेल सांगता येत नाही.