शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

राजलक्ष्मीनगरातील पूल बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST

राधानगरी व गारगोटी रस्त्यास जोडणाऱ्या वाहतुकीसाठी दुवा म्हणून हा पूल महत्त्वाचा असून दुचाकी, चारचाकी वाहतुकीची मोठी वर्दळी या पुलावरून ...

राधानगरी व गारगोटी रस्त्यास जोडणाऱ्या वाहतुकीसाठी दुवा म्हणून हा पूल महत्त्वाचा असून दुचाकी, चारचाकी वाहतुकीची मोठी वर्दळी या पुलावरून होत असते. त्यामुळे याची दुरुस्ती क्रमप्राप्त आहे.

क्रेशेर चौक ते संभाजीनगर रस्ता नगरोत्थान योजनेअंतर्गत रुंदीकरण करताना साळोखेनगरातून वाहत येणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर पांडुरंगनगरी नजीक दहा वर्षांपूर्वी हा पूल विकसित करण्यात आला. मात्र, पुलाच्या उभारणीनंतर दुसऱ्या वर्षापासून दुरवस्था व्हायला सुरुवात झाली.

उभारण्यात आलेल्या नैसर्गिक पुलावरून पावसाचे पाण्याचे निर्गतिकरण होत नसल्याने प्रतिवर्षी दळवी कॉलनी, शाम हौसिंग सोसायटी, राजलक्ष्मीनगर या मोठ्या नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते. नैसर्गिक नाल्याच्या पात्रालगत अंतराचे नियम धाब्यावर बसवत अतिक्रमणे करण्यात आली असल्याने पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने उभारण्यात आलेल्या पुलावर मोठा ताण पडत असल्याने पूल कमकुवत होत आहे.

पुलानजीकचा रस्तासुद्धा खचू लागला असून संबंधित प्रशासनाने तत्काळ देखभाल दुरुस्ती न केल्यास भविष्यात पूल कधी कोसळेल सांगता येत नाही.

कोट : पुलाच्या दुरुस्तीसंदर्भात प्रशासनास सुचवण्यात आले असून, नुकतीच संबंधित प्रशासनाच्या उपस्थितीत आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह पाहणी करण्यात आली आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहू. -माजी नगरसेविका, दीपा मगदूम, राजलक्ष्मीनगर प्रभाग ७०

चौकट : सुस्त प्रशासन

चार वर्षांपूर्वी आपटेनगर प्रभागातील नैसर्गिक नाल्यावर उभारण्यात आलेल्या पुलाचा भराव पावसाळ्यात वाहून गेल्याने पूल खचला होता. त्यावेळी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी प्रशासनास लेखी निवेदन देऊन सज्जड दम दिला. तरीही पुलाची दुरुस्ती व्हायला दोन वर्षांचा कालावधी गेला. यावरून पुलांच्या दुरुस्तीबाबतीत प्रशासन किती कार्यतत्पर आहे हे सांगायला नको.

फोटो : राजलक्ष्मीनगरातील नैसर्गिक नाल्यावर पांडुरंगनगरी येथे बांधण्यात आलेल्या पुलाची प्रचंड दुरवस्था झाली असून हा पूल कधी कोसळेल सांगता येत नाही.