शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या बाटल्या फोडून निषेध

By admin | Updated: June 2, 2016 01:27 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : इचलकरंजी दारू दुकान बंदसाठी आंदोलक आक्रमक

कोल्हापूर : इचलकरंजी येथील बावणे गल्लीतील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दारूच्या बाटल्या फोडून, तसेच शेण ओतून आक्रमक आंदोलन केले. अचानक घडलेल्या या आंदोलनामुळे खळबळ उडाली. तब्बल दोन तास भर उन्हात आंदोलकांनी ठिय्या मारला. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आज, गुरुवारी दुपारी १२ वाजता बैठक घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. त्यानंतर सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेले. इचलकरंजी येथील बावणे गल्लीतील वॉर्ड नं. १२ मध्ये असणारे दारूचे दुकान २४ तासांत बंद करावे किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात दोन वर्षांच्यावर अनिश्चित काळासाठी बंद करावे, या मागणीसाठी सोमवारी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेऊन आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचे असून, हा प्रश्न आजच्या आज निकालात निघाला पाहिजे, असे सांगितले. यावेळी, दालनात दुसऱ्या एका आंदोलकांबरोबर चर्चा सुरू असल्याने थोडा वेळ थांबा. यानंतर आपण बोलू, असे आंदोलकांना सांगितले. परंतु, आक्रमक झालेल्या आंदोलकांनी तेथून बाहेर येऊन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाशेजारी दारूच्या बाटल्या फोडून व सोबत आणलेल्या शेणाच्या पिशव्या ओतून निषेध केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. फुटणाऱ्या दारूच्या बाटल्यांच्या आवाजाने उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराची माहिती कळताच काही वेळातच पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला. तोपर्यंत आंदोलकांनी भर उन्हातच फुटलेल्या बाटल्यांशेजारीच ठिय्या मारला. जिल्हाधिकाऱ्यांशी भेट झाल्यानंतरच येथून उठणार, असा पवित्रा त्यांनी घेतला. संघटनेचे अध्यक्ष उदय घाडगे यांनी फुटलेली बाटली हातात घेऊन, जर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीपूर्वी ताब्यात घेतले तर हाताची शीर कापून घेण्याची धमकी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांचीही आंदोलकांना ताब्यात घेताना अडचण झाली. तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांशी प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून संपर्क साधला जात होता. परंतु, ते गगनबावड्याला गेल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. तोपर्यंत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेंद्र कावळे यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क झाल्यानंतर आज, गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आंदोलकांची बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास हे आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.