शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

वाळव्यातील दहशतवाद मोडून काढा

By admin | Updated: February 27, 2017 23:36 IST

राजू शेट्टी : प्रसंगी कायदा हातात घेण्याचा पोलिस यंत्रणेला इशारा; सांगलीत कार्यकर्त्यांचा विराट मोर्चा

सांगली : वाळव्यात गोळीबार करणाऱ्यांनीच हुतात्मा संकुलाच्या नायकवडी कुटुंबातील सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असून, काही नेत्यांच्या इशाऱ्यावर वाळव्यात सुरू असलेली दहशत त्वरित मोडीत काढा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी पोलिस यंत्रणेला दिला. वाळवा तालुक्यातील पाच हजारावर कार्यकर्त्यांनी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर वाळवा येथे २३ फेब्रुवारी राजकीय वादातून गोळीबार झाला होता. मात्र गोळीबार व हाणामारी करणाऱ्यांनीच वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी व इतर कार्यकर्त्यांवर आष्टा पोलिसांत खोटे गुन्हे दाखल केले आहेत. याच्या निषेधार्थ वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विराट मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात सांगलीवाडी येथून झाली. मोर्चात खासदार राजू शेट्टी, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, जि. प. सदस्या प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, डॉ. बाबूराव गुरव, रणधीर नाईक, वैभव पवार, बाळासाहेब नायकवडी, विक्रम पाटील, सुरेखा आडमुठे, नजीर वलांडकर, गौरव नायकवडी, जयराज पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी पाटील सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी खा. शेट्टी म्हणाले की, आचारसंहिता असताना वाळव्यात उमेदवाराच्या पतीकडे गोळीबारासाठी हत्यार आले कुठून, असा प्रश्न आहे. त्यांनी गोळीबार केला, त्यावेळी पोलिस उपस्थित होते. मात्र तेथे नायकवडी कुटुंबियांपैकी कोणीही नसताना त्रास द्यायचा म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आमचा संयम सुटण्यापूर्वी पोलिसांनी दोषी असणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ‘मास्टरमार्इंड’वरही कारवाई करावी. आम्ही चुकणार नाही, पण कोणी मुद्दाम चुकत असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही कायदा हातात घेण्यापूर्वी दोषींना अटक करा, अन्यथा आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल. दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाची कुंडलीच त्यांच्यासमोर मांडणार आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.वाळव्यात दहशत माजविणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा बदोबस्त त्वरित करा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा अन्य नेत्यांनीही दिला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन दिले. (प्रतिनिधी)...तर शिंगावरही घेणार : शेट्टीक्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचाराने आम्ही काम करीत आहोत. संयम आणि लोकशाही मार्गाने न्याय मागत आहोत. आम्ही संयम दाखवतो याचा अर्थ दहशतीला भीत आहोत, असा कोणी समज करून घेऊ नये. कोणी अंगावर आले, तर प्रसंगी त्यांना शिंगावरही घेण्याचे आम्हाला चांगले कळते. नायकवडी कुटुंबीयांच्याच नव्हे, तर एकाही कार्यकर्त्याच्या अंगाला हात लावाल तर याद राखा, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.गोळीबार प्रकरणाची सीआयडी चौकशी करा : वैभव नायकवडीवाळव्यातील गोळीबार पराभूत झालेल्या उमेदवाराच्या पतीने केला. याला चार पोलिस आणि अधिकारी साक्षीदार आहेत. पण, काही नेत्यांच्या इशाऱ्यामुळे केवळ नायकवडी कुटुंबीयांची बदनामी करण्याच्या हेतूने गोळीबार प्रकरणात किरण नायकवडी, गौरव नायकवडी यांच्यासह पाचजणांवर खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी. गोळीबारातील हत्यार कोठून आले याचा तपास व्हावा. त्यांच्या मास्टरमार्इंडचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वैभव नायकवडी यांनी केली. प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनीही गोळीबारातील खरा आरोपी मोकाट फिरतोच कसा, असा सवाल केला.