शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

वाळव्यातील दहशतवाद मोडून काढा

By admin | Updated: February 27, 2017 23:36 IST

राजू शेट्टी : प्रसंगी कायदा हातात घेण्याचा पोलिस यंत्रणेला इशारा; सांगलीत कार्यकर्त्यांचा विराट मोर्चा

सांगली : वाळव्यात गोळीबार करणाऱ्यांनीच हुतात्मा संकुलाच्या नायकवडी कुटुंबातील सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असून, काही नेत्यांच्या इशाऱ्यावर वाळव्यात सुरू असलेली दहशत त्वरित मोडीत काढा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी पोलिस यंत्रणेला दिला. वाळवा तालुक्यातील पाच हजारावर कार्यकर्त्यांनी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर वाळवा येथे २३ फेब्रुवारी राजकीय वादातून गोळीबार झाला होता. मात्र गोळीबार व हाणामारी करणाऱ्यांनीच वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी व इतर कार्यकर्त्यांवर आष्टा पोलिसांत खोटे गुन्हे दाखल केले आहेत. याच्या निषेधार्थ वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विराट मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात सांगलीवाडी येथून झाली. मोर्चात खासदार राजू शेट्टी, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, जि. प. सदस्या प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, डॉ. बाबूराव गुरव, रणधीर नाईक, वैभव पवार, बाळासाहेब नायकवडी, विक्रम पाटील, सुरेखा आडमुठे, नजीर वलांडकर, गौरव नायकवडी, जयराज पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी पाटील सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी खा. शेट्टी म्हणाले की, आचारसंहिता असताना वाळव्यात उमेदवाराच्या पतीकडे गोळीबारासाठी हत्यार आले कुठून, असा प्रश्न आहे. त्यांनी गोळीबार केला, त्यावेळी पोलिस उपस्थित होते. मात्र तेथे नायकवडी कुटुंबियांपैकी कोणीही नसताना त्रास द्यायचा म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आमचा संयम सुटण्यापूर्वी पोलिसांनी दोषी असणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ‘मास्टरमार्इंड’वरही कारवाई करावी. आम्ही चुकणार नाही, पण कोणी मुद्दाम चुकत असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही कायदा हातात घेण्यापूर्वी दोषींना अटक करा, अन्यथा आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल. दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाची कुंडलीच त्यांच्यासमोर मांडणार आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.वाळव्यात दहशत माजविणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा बदोबस्त त्वरित करा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा अन्य नेत्यांनीही दिला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन दिले. (प्रतिनिधी)...तर शिंगावरही घेणार : शेट्टीक्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचाराने आम्ही काम करीत आहोत. संयम आणि लोकशाही मार्गाने न्याय मागत आहोत. आम्ही संयम दाखवतो याचा अर्थ दहशतीला भीत आहोत, असा कोणी समज करून घेऊ नये. कोणी अंगावर आले, तर प्रसंगी त्यांना शिंगावरही घेण्याचे आम्हाला चांगले कळते. नायकवडी कुटुंबीयांच्याच नव्हे, तर एकाही कार्यकर्त्याच्या अंगाला हात लावाल तर याद राखा, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.गोळीबार प्रकरणाची सीआयडी चौकशी करा : वैभव नायकवडीवाळव्यातील गोळीबार पराभूत झालेल्या उमेदवाराच्या पतीने केला. याला चार पोलिस आणि अधिकारी साक्षीदार आहेत. पण, काही नेत्यांच्या इशाऱ्यामुळे केवळ नायकवडी कुटुंबीयांची बदनामी करण्याच्या हेतूने गोळीबार प्रकरणात किरण नायकवडी, गौरव नायकवडी यांच्यासह पाचजणांवर खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी. गोळीबारातील हत्यार कोठून आले याचा तपास व्हावा. त्यांच्या मास्टरमार्इंडचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वैभव नायकवडी यांनी केली. प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनीही गोळीबारातील खरा आरोपी मोकाट फिरतोच कसा, असा सवाल केला.