शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

वाळव्यातील दहशतवाद मोडून काढा

By admin | Updated: February 27, 2017 23:36 IST

राजू शेट्टी : प्रसंगी कायदा हातात घेण्याचा पोलिस यंत्रणेला इशारा; सांगलीत कार्यकर्त्यांचा विराट मोर्चा

सांगली : वाळव्यात गोळीबार करणाऱ्यांनीच हुतात्मा संकुलाच्या नायकवडी कुटुंबातील सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असून, काही नेत्यांच्या इशाऱ्यावर वाळव्यात सुरू असलेली दहशत त्वरित मोडीत काढा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी पोलिस यंत्रणेला दिला. वाळवा तालुक्यातील पाच हजारावर कार्यकर्त्यांनी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर वाळवा येथे २३ फेब्रुवारी राजकीय वादातून गोळीबार झाला होता. मात्र गोळीबार व हाणामारी करणाऱ्यांनीच वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी व इतर कार्यकर्त्यांवर आष्टा पोलिसांत खोटे गुन्हे दाखल केले आहेत. याच्या निषेधार्थ वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विराट मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात सांगलीवाडी येथून झाली. मोर्चात खासदार राजू शेट्टी, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, जि. प. सदस्या प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, डॉ. बाबूराव गुरव, रणधीर नाईक, वैभव पवार, बाळासाहेब नायकवडी, विक्रम पाटील, सुरेखा आडमुठे, नजीर वलांडकर, गौरव नायकवडी, जयराज पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी पाटील सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी खा. शेट्टी म्हणाले की, आचारसंहिता असताना वाळव्यात उमेदवाराच्या पतीकडे गोळीबारासाठी हत्यार आले कुठून, असा प्रश्न आहे. त्यांनी गोळीबार केला, त्यावेळी पोलिस उपस्थित होते. मात्र तेथे नायकवडी कुटुंबियांपैकी कोणीही नसताना त्रास द्यायचा म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आमचा संयम सुटण्यापूर्वी पोलिसांनी दोषी असणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ‘मास्टरमार्इंड’वरही कारवाई करावी. आम्ही चुकणार नाही, पण कोणी मुद्दाम चुकत असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही कायदा हातात घेण्यापूर्वी दोषींना अटक करा, अन्यथा आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल. दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाची कुंडलीच त्यांच्यासमोर मांडणार आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.वाळव्यात दहशत माजविणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा बदोबस्त त्वरित करा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा अन्य नेत्यांनीही दिला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन दिले. (प्रतिनिधी)...तर शिंगावरही घेणार : शेट्टीक्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचाराने आम्ही काम करीत आहोत. संयम आणि लोकशाही मार्गाने न्याय मागत आहोत. आम्ही संयम दाखवतो याचा अर्थ दहशतीला भीत आहोत, असा कोणी समज करून घेऊ नये. कोणी अंगावर आले, तर प्रसंगी त्यांना शिंगावरही घेण्याचे आम्हाला चांगले कळते. नायकवडी कुटुंबीयांच्याच नव्हे, तर एकाही कार्यकर्त्याच्या अंगाला हात लावाल तर याद राखा, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.गोळीबार प्रकरणाची सीआयडी चौकशी करा : वैभव नायकवडीवाळव्यातील गोळीबार पराभूत झालेल्या उमेदवाराच्या पतीने केला. याला चार पोलिस आणि अधिकारी साक्षीदार आहेत. पण, काही नेत्यांच्या इशाऱ्यामुळे केवळ नायकवडी कुटुंबीयांची बदनामी करण्याच्या हेतूने गोळीबार प्रकरणात किरण नायकवडी, गौरव नायकवडी यांच्यासह पाचजणांवर खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी. गोळीबारातील हत्यार कोठून आले याचा तपास व्हावा. त्यांच्या मास्टरमार्इंडचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वैभव नायकवडी यांनी केली. प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनीही गोळीबारातील खरा आरोपी मोकाट फिरतोच कसा, असा सवाल केला.