शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बँकेतील भ्रष्ट कारभार मोडून काढणार

By admin | Updated: March 19, 2015 00:01 IST

विश्वासराव माने : मूठभर संचालकांमुळे बँक बनलीय गुंडांचा अड्डा

भारत चव्हाण - कोल्हापूर अनावश्यक खरेदी, वारेमाप खर्च, बोगस बिले सादर करून प्रवास भत्ते उचलणे यासारखे अनेक प्रकार राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट बॅँकेत घडत असून, हा भ्रष्ट कारभार मोडून काढून तेथे स्वच्छ व पारदर्शी कारभार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राजर्षी शाहू आदर्श पॅनेलचे प्रमुख व बँकेचे विद्यमान संचालक विश्वासराव माने यांनी बॅँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘लोकमत’कडे आपली भूमिका मांडताना दिली. मूठभर संचालकांमुळे बॅँक ही गुंडांचा अड्डा बनला असून, राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला लागलेला हा कलंक पुसून टाकण्यात सभासद पुढाकार घेतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गुंडगिरी, दहशत निर्माण करून तसेच प्रसंगी विरोधी भूमिका घेणाऱ्या संचालकांवर दबाव टाकून, धमक्या देऊन बॅँक आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न रवींद्र पंदारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे, असा आरोप विश्वासराव माने यांनी केला. गैरकारभाराची माहिती देताना माने यांनी सांगितले की, सत्तारूढ पंदारे गटाने गेल्या पाच वर्षांत संस्थेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी केली आहे. एक कोटींची ठेव ठेवून घेताना ३१ मार्चला एक धनादेश स्वीकारला; परंतु हा धनादेश प्रत्यक्षात २४ एप्रिलला वठला. त्यामुळे बँकेला नुकसान झाले. माजी अध्यक्ष चंद्रकांत घाटगे यांनी ३५ हजारांची खोटी बिले सादर करून प्रवास भत्ते उचलले आहेत. संचालक मंडळाने नको त्या कारणांसाठी खरेदी करून वारेमाप पैसे खर्च केले आहेत. पंदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गैरकारभार करून बॅँकेचे नाव खराब केले आहे.रवींद्र पंदारे व शशिकांत तिवले हे सभेचे खोटे इतिवृत्तांत लिहिण्यात पटाईत आहेत. यासंदर्भात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन निकाल त्यांच्या विरोधात गेला आहे, त्यावरूनच त्यांच्या भ्रष्ट कारभाराची प्रचिती येते, असे सांगून माने म्हणाले की, ‘संगणक, स्टेशनरीवर किती खर्च केला याची माहिती मागूनही दिली जात नाही. आपल्या मर्जीतील सहा कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भरती करून त्यांना वेतनवाढीही दिल्या आहेत. संचालकाच्या एका मेहुण्याची गाडी भाड्याने घेतली आहे. या गाडी वापरावर किती खर्च केला याची माहिती दिली जात नाही.’संचालकाला घातले कोंडून माने यांनी सांगितले की, ज्येष्ठ संचालक रंगराव आळवेकर यांनी २०११ मध्ये विद्यमान संचालकांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे पंदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीवेळी आळवेकरांना कोंडून घालून, धमकावून राजीनामा लिहून घेतला. बँकेत भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना राज्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या विरोधात लढताना मर्यादा येत होत्या. आता सभासदच अशा लोकांना बाहेर काढतील.‘गव्हर्न्मेंट सर्व्हंट बॅँक निवडणूक’‘माझी भूमिका’