शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

‘ब्रेनडेड’ रवींंद्रच्या यकृताने भारत हसूरकरांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:42 IST

कोल्हापूर : सोलापूरमधील अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या रवींद्र श्रीरंग शिंगाडे यांच्या अवयदानामुळे कोल्हापुरातील भारत रामचंद्र हसूरकर (वय ४३, रा. बाबूजमाल परिसर) यांना जीवनदान मिळाले. त्यांच्यावर पुण्यातील आदित्य बिर्ला रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची १३ तासांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, ते आता पूर्ण शुद्धीवर आले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सक्रिय कार्यकर्त्या गीता हसूरकर यांचे ...

कोल्हापूर : सोलापूरमधील अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या रवींद्र श्रीरंग शिंगाडे यांच्या अवयदानामुळे कोल्हापुरातील भारत रामचंद्र हसूरकर (वय ४३, रा. बाबूजमाल परिसर) यांना जीवनदान मिळाले. त्यांच्यावर पुण्यातील आदित्य बिर्ला रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची १३ तासांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, ते आता पूर्ण शुद्धीवर आले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सक्रिय कार्यकर्त्या गीता हसूरकर यांचे ते पती आहेत.शिंगाडे कुटुंबीयांनी दाखविलेली माणुसकी मोलाची ठरल्याची प्रतिक्रिया गीता हसूरकर यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या दुर्धर आजारपणामुळे त्या कुटुंबाची मानसिक स्थिती खूपच खचलेली असते. अशा परिस्थितीत आपलेही पाठ फिरवितात, तेव्हा ते दु:ख अगणित असते. अशातच एखादे अनोळखी कुटुंब, जे आपल्यापेक्षाही जास्त दु:खात असूनही मदतीला धावून येते, तेव्हा कोण आपले आणि कोण परके याची प्रखरतेने जाणीव होते. रवींद्र शिंगाडे यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा घेतलेला निर्णय खऱ्या अर्थाने आमच्या कुटुंबाला जीवनदान देणारा ठरला.’त्याचे घडले असे : भारत हसूरकर हे एका फार्मसी कंपनीत विभागीय व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. त्यांचा पारंपरिक सोनार कामाचा व्यवसायही आहे. त्यांना गेल्या दोन वर्षांपासून यकृताचा त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरनी त्यांना यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी पुणे, औरंगाबाद व मुंबई येथे यकृत हवे म्हणून नोंदणी केली होती. याच दरम्यान पुणे-सोलापूर द्रुतगती मार्गावर २० जुलैला रवींद्र शिंगाडे यांचा अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा ब्रेन डेड झाल्यावर त्यांच्या पत्नीसह आई, वडील व भावाने अवयवदान करण्यास संमती दिली. त्यानुसार रवींद्र याचे हृदय, किडनी, स्वादुपिंड व यकृत दान करण्यात आले.सोमवारी (दि. २३) रात्री आठ वाजता त्यांचे यकृत पुण्यात आणण्यात आले व १३ तासांची शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपण करण्यात आले. आता हसूरकर यांची प्रकृती कमालीची सुधारत आहे.शिंगाडे कुटुंबीयांचे आभार कसे मानावेत यासाठी शब्द अपुरे असल्याची भावना गीता हसूरकर यांनी व्यक्त केली आहे. रविंद्र यांच्या अवयव दानामुळे तब्बल चारजणांना नवे जीवन मिळाले आहे.शिंगाडे झाले अमरउभे आयुष्य ज्याच्यासोबत काढायचं होतं तोच आपल्याला अर्ध्या वाटेवरच सोडून जातोय, याचे दु:ख त्या कुटुंबाला सहन झाले नसेल; पण अशा परिस्थितीतही आपले दु:ख बाजूला सारून त्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि समाजासमोर एक चांगले उदाहरण ठेवले. रवींद्र शरीराने आपल्यात हजर नाहीत; परंतु दान केलेल्या अवयवाच्या माध्यमातून ते आजसुद्धा या जगात राहू शकतात.