शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘अमृत जल योजना’ बैठकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदानोळी : वारणा बचाव कृती समितीकडून आज, मंगळवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात इचलकरंजीच्या अमृत पाणी योजनेबाबतच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. त्या योजनेस कोणत्याही परिस्थितीत पाणी देणार नाही यावर कृती समिती ठाम आहे, असा निर्णय दानोळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेतला.दानोळीतील वारणा नदीतून इचलकरंजीला जाणारी अमृत ...

लोकमत न्यूज नेटवर्कदानोळी : वारणा बचाव कृती समितीकडून आज, मंगळवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात इचलकरंजीच्या अमृत पाणी योजनेबाबतच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. त्या योजनेस कोणत्याही परिस्थितीत पाणी देणार नाही यावर कृती समिती ठाम आहे, असा निर्णय दानोळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेतला.दानोळीतील वारणा नदीतून इचलकरंजीला जाणारी अमृत जल योजनेस वारणा काठावरील गावांचा विरोध आहे. ही योजना रद्द करण्यात यावी अशी शिफारस शासनास करावी, अशी भूमिका कृती समितीची आहे. पंचगंगा व कृष्णा या नद्यांतून इचलकरंजी शहराला बारमाही पाणीपुरवठा केला जातो. दोन मोठ्या पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वित असताना या योजनांबाबत काही किरकोळ व तकलादू अशी कारणे पुढे करून गरज नसताना वारणा नदीतून शेतीचे पाणी उचलण्याचा घाट घातला जात आहे. तो अनावश्यक असून, शेतकºयांवर अन्यायकारक असल्याने वारणा काठावरील सर्व गावांनी या अमृत योजनेस विरोध असल्याचा ठराव करून दोनवेळा गाव बंद ठेवून तीव्र विरोध केला आहे.दोन्ही कालव्याची कामे अद्याप अपूर्ण आहेत, यासह अनेक कारणांमुळे अमृत योजनेस वारणा काठच्या गावांचा वारणा बचाव कृती समितीच्या माध्यमातून विरोध होता व तो यापुढेही राहील, असा निर्णय बैठकीत झाला.यावेळी वारणा बचाव कृती समिती अध्यक्ष महादेव धनवडे, उपाध्यक्ष केशव राऊत, सरपंच सुजाता शिंदे, उपसरपंच गब्रू गावडे, काँग्रेस शिरोळ तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, शिवसेना शिरोळ तालुकाप्रमुख सतीश मलमे, ग्रामपंचायत सदस्य जंबू सकप्पा, राजाराम माने, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पिसे, बाजार समिती सदस्य संदीप हवालदार, रामचंद्र शिंदे, रावसाहेब भिलवडे, गुंडू दळवी, बापूसो दळवी, मानजीराव भोसले, सुरेश माणगांवे, रावसाहेब खिचडे, उदय होगले, उमेश केकले, सोमा गावडे, श्रीकांत लंबे, प्रकाश लंबे उपस्थित होते.