शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

बहिष्कार कायमच...

By admin | Updated: December 13, 2015 01:23 IST

सर्किट बेंच प्रश्न : वकील कामकाजापासून अलिप्त

 कोल्हापूर : शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये येथील वकील कामकाजापासून अलिप्त राहिल्याने त्यांचा बहिष्कार कायम असल्याचे यावेळी दिसून आले. टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयात या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी आलेल्या बहुसंख्य पक्षकारांनी अदालतीमध्ये सहभागी न होता, त्यांना पाठविलेल्या नोटिसा त्यांनी वकिलांना यावेळी दिल्या. यावेळी वकिलांनी पक्षकारांना फुले देऊन आभार मानले. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, ही तीन दशकांहून अधिक मागणी आहे. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांतील वकिलांनी या राष्ट्रीय लोकअदालतीच्या कामकाजात सहभागी होऊ नये, असे आवाहन खंडपीठ कृती समितीने केले होते. त्यानुसार वकिलांनी कामकाजात सहभाग घेतला नाही; पण समितीचे निमंत्रक तथा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांच्यासह वकील बांधव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात सकाळी दहापासून ते दुपारपर्यंत बसून होते. यावेळी लोकअदालतीसाठी येथे आलेल्या बहुतांश पक्षकारांनी आपल्या नोटिसा वकिलांना देत कोल्हापुरात सर्किट बेंचप्रश्नी लढ्यामध्ये आपणही सहभागी असल्याचे सांगितले. यावेळी सेके्रटरी अ‍ॅड. रवींद्र जानकर, अ‍ॅड. दिगंबर पाटील, अ‍ॅड. सुशीला चव्हाण, अ‍ॅड. अनिलकुमार गोडे, अ‍ॅड. इंदिरा राजेपांढरे, अ‍ॅड. माणिक शिंदे, अ‍ॅड. पल्लवी थोरात, अ‍ॅड. अभिजित जोशी यांच्यासह वकील उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रीय लोकअदालतीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी येथे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. (प्रतिनिधी)  

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कोल्हापूरसह इतरही जिल्ह्यांतील वकील कामकाजापासून अलिप्त राहिले. त्यामुळे या अदालतीवर वकिलांचा बहिष्कार कायम आहे, हे दिसून येते. - राजेंद्र चव्हाण, निमंत्रक खंडपीठ कृती समिती, कोल्हापूर.