शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

इनामी जमीन हीच मार्गातील अडसर

By admin | Updated: March 26, 2015 00:05 IST

माणगावातील स्मारक : एकत्र संघर्षाची गरज

विश्वास पाटील- कोल्हापूर : माणगाव (ता. हातकणंगले) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक ज्या जागेवर होणार आहे ती जमीन इनामी असल्याने तिला मोबदला देता येत नाही. हीच या स्मारकातील मोठी अडचण होऊन बसली आहे. हे स्मारक होण्यासाठी दलित संघटनांनी एकीची वज्रमूठ आवळण्याची गरज आहे. माणगावला शुक्रवारी बौद्ध व आंबेडकरी बांधवांतर्फे सहाव्या अशोक स्तंभाची उभारणी करण्यात येत आहे. जिथे आंबेडकर यांचे पाऊल लागले, अशी ही पवित्र जागा आहे. त्यामुळे या स्मारकाला वेगळेच महत्त्व आहे. हे स्मारक रखडण्याचे सगळ््यात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यासाठी लागणारी जागा. ग्रामस्थ जागा देण्यासाठी तयार आहेत; परंतु त्या देत असलेल्या जमिनी या इनामी आहेत. कायद्याने ‘इनामी जमिनी’ला सरकार मोबदला देत नाही. कारण या जमिनीवर सरकारची मालकी असते. स्मारकासाठी गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार असेल तर त्यांना काही ना काही मोबदला देण्याची गरज आहे; परंतु तो द्यायचा झाल्यास कायद्यात बदल करावा लागतो. शासन त्या पातळीवर फारसा ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. त्यामुळे भूसंपादनाचे व पर्यायाने स्मारकाचे काम रखडले आहे.दलित चळवळीतील विविध गटांच्या राहुट्या वेगळ््या असल्या तरी किमान काही प्रश्नांवर तरी या समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. प्रतिवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सगळे गट एकत्र येऊन साजरी करतात, तशीच सर्व गटांना प्रतिनिधित्व देऊन या स्मारकाचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन होण्याची गरज आहे. (समाप्त)मंजूर दहा कोटी रुपये निधी मिळविण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटणार आहे. आता सरकार आमचे आले असल्याने त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझीच आहे.- डॉ. सुजित मिणचेकर, आमदार राज्यात सत्तेत आलेल्या सरकारची मानसिकता आंबेडकरी विचार व चळवळ मोडून काढणारी आहे. त्यामुळे सर्वांनी स्मारकासाठी नव्याने संघर्षाची गरज आहे. - दगडू भास्करजिल्हाध्यक्ष, जोगेंद्र कवाडे गटस्मारक लवकर व्हावे यासाठी खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व समाजकल्याण मंत्री रामनाथ बडोले यांना भेटणार आहे. या शासनानेही हलगर्जीपणा केल्यास आंदोलन करू.- प्रा. शहाजी कांबळेपश्चिम महाराष्ट्र संघटक,आठवले गट‘के.पी.’ यांच्यावर टीकास्मारकासाठी दहा कोटी रुपये मंजूर आणले म्हणून सगळीकडे डिजिटल लावून सत्कार करून घेणाऱ्या तत्कालीन आमदार के. पी. पाटील यांना माणगाव कुठे आहे हे तरी माहीत आहे का, अशी विचारणा आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी केली आहे. के. पी. यांनी श्रेयवाद घेतलेला निधी कुठे आहे हे सांगावे व आंबेडकरी जनतेची फसवणूक करू नये, अशी टीका प्रा. शहाजी कांबळे यांनी केली.