शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

इनामी जमीन हीच मार्गातील अडसर

By admin | Updated: March 26, 2015 00:05 IST

माणगावातील स्मारक : एकत्र संघर्षाची गरज

विश्वास पाटील- कोल्हापूर : माणगाव (ता. हातकणंगले) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक ज्या जागेवर होणार आहे ती जमीन इनामी असल्याने तिला मोबदला देता येत नाही. हीच या स्मारकातील मोठी अडचण होऊन बसली आहे. हे स्मारक होण्यासाठी दलित संघटनांनी एकीची वज्रमूठ आवळण्याची गरज आहे. माणगावला शुक्रवारी बौद्ध व आंबेडकरी बांधवांतर्फे सहाव्या अशोक स्तंभाची उभारणी करण्यात येत आहे. जिथे आंबेडकर यांचे पाऊल लागले, अशी ही पवित्र जागा आहे. त्यामुळे या स्मारकाला वेगळेच महत्त्व आहे. हे स्मारक रखडण्याचे सगळ््यात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यासाठी लागणारी जागा. ग्रामस्थ जागा देण्यासाठी तयार आहेत; परंतु त्या देत असलेल्या जमिनी या इनामी आहेत. कायद्याने ‘इनामी जमिनी’ला सरकार मोबदला देत नाही. कारण या जमिनीवर सरकारची मालकी असते. स्मारकासाठी गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार असेल तर त्यांना काही ना काही मोबदला देण्याची गरज आहे; परंतु तो द्यायचा झाल्यास कायद्यात बदल करावा लागतो. शासन त्या पातळीवर फारसा ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. त्यामुळे भूसंपादनाचे व पर्यायाने स्मारकाचे काम रखडले आहे.दलित चळवळीतील विविध गटांच्या राहुट्या वेगळ््या असल्या तरी किमान काही प्रश्नांवर तरी या समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. प्रतिवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सगळे गट एकत्र येऊन साजरी करतात, तशीच सर्व गटांना प्रतिनिधित्व देऊन या स्मारकाचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन होण्याची गरज आहे. (समाप्त)मंजूर दहा कोटी रुपये निधी मिळविण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटणार आहे. आता सरकार आमचे आले असल्याने त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझीच आहे.- डॉ. सुजित मिणचेकर, आमदार राज्यात सत्तेत आलेल्या सरकारची मानसिकता आंबेडकरी विचार व चळवळ मोडून काढणारी आहे. त्यामुळे सर्वांनी स्मारकासाठी नव्याने संघर्षाची गरज आहे. - दगडू भास्करजिल्हाध्यक्ष, जोगेंद्र कवाडे गटस्मारक लवकर व्हावे यासाठी खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व समाजकल्याण मंत्री रामनाथ बडोले यांना भेटणार आहे. या शासनानेही हलगर्जीपणा केल्यास आंदोलन करू.- प्रा. शहाजी कांबळेपश्चिम महाराष्ट्र संघटक,आठवले गट‘के.पी.’ यांच्यावर टीकास्मारकासाठी दहा कोटी रुपये मंजूर आणले म्हणून सगळीकडे डिजिटल लावून सत्कार करून घेणाऱ्या तत्कालीन आमदार के. पी. पाटील यांना माणगाव कुठे आहे हे तरी माहीत आहे का, अशी विचारणा आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी केली आहे. के. पी. यांनी श्रेयवाद घेतलेला निधी कुठे आहे हे सांगावे व आंबेडकरी जनतेची फसवणूक करू नये, अशी टीका प्रा. शहाजी कांबळे यांनी केली.