शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

गव्याच्या हल्ल्यात दोघे ठार

By admin | Updated: May 13, 2017 00:53 IST

गव्याच्या हल्ल्यात दोघे ठार

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी (जि. कोल्हापूर) : आकुर्डे (ता. भुदरगड) येथे शुक्रवारी सकाळी गव्याच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधीही गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. अनिल पांडुरंग पोवार (वय ४४, रा. आकुर्डे) व बी न्यूज वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी रघुनाथ महादेव शिंदे (५२, रा. गारगोटी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. बिथरलेल्या गव्याच्या थैमानामुळे गारगोटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी सकाळी आकुर्डे येथील तीन तरुण शेतकरी वैरण आणण्यासाठी ‘भैरुचा माळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात गेले होते. उसाचा पाला काढत असताना गव्याच्या कळपातून चुकलेल्या मोठ्या गव्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये तिघांपैकी दोघे पळून गेले. तर अनिल पोवार या तरुणावर गव्याने हल्ला केला. अनिल यांच्या पोटात शिंग घुसून रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य हल्ल्यातून बचावलेल्या दोघांनी ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान, कोल्हापूरच्या एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी रघुनाथ शिंदे दुपारी बाराच्या दरम्यान घटनास्थळी गेले. यावेळी पन्नास लोकांचा समूह एका रस्त्याने गव्यांच्या मागावर होता. त्यावेळी गोंगाटाने बिथरलेल्या गव्याने अचानक लोकांवर हल्ला केला. रघुनाथ शिंदे शेताच्या बांधावर उभे राहून गव्याचे शूटिंग करत असताना गव्याने मागे फिरून त्यांना धडक दिली. या हल्ल्यात शिंदे यांच्या पोटात एक शिंग घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. शिंदे यांना मोटारसायकलवरून गारगोटी येथे आणले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक करून तातडीने कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृत अनिल पोवार हे आकुर्डे येथील दत्तगुरू दूध संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले आहेत. तर मृत रघुनाथ शिंदे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परिवार आहे. पाण्यासाठी गवे शिवारात घुसलेजंगलातील गवे सध्या पाण्याच्या शोधासाठी शिवारात घुसल्याने नागरिकांनी सतर्क रहावे. शेतात, पाण्याच्या जवळ जाताना सावधानता बाळगावी. कोणत्याही परिस्थितीत त्याला हुसकवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी बचावात्मक पवित्रा घ्या असे आवाहन परिक्षेत्र वन अधिकारी अशोक पाटील, वनक्षेत्रपाल भुदरगड यांनी केले आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून....गव्यापासून बचावासाठी काही लोक दहा फूट उंचीच्या बांधावर उभे होते. अचानक गवा बांधावर चढल्याने तारांबळ उडाली. यावेळी गव्याने दिशा बदलली. त्यावेळी विठ्ठल कुंभार बांधावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून गवा गेला. त्याचवेळी समोर शूटिंग करत असलेल्या पत्रकार रघुनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला, पण केवळ दैव बलवत्तर म्हणून चार-पाचजणांचा जीव वाचला.जमावाच्या गोंगाटाने गवे बिथरलेगेल्या काही दिवसांपासून गव्याचा कळप या परिसरात आहे. शुक्रवारी सकाळी अनिल पोवार यांच्या मृत्यूनंतर परिसरातील ग्रामस्थांचा जमाव घटनास्थळी जमला. गव्याच्या मागावर हा जमाव होता. जमावातील काहीजण आरडाओरड करत होते. जमावाच्या गोंगाटामुळेच गवे बिथरले असण्याची शक्यता आहे. मोबाईलवरुन शूटिंगचा असुरी आनंदघटनास्थळावर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. झाडावर बसून काही तरुण या गव्यांची टेहळणी करत होते. गवा हल्ला करीत असताना काही उत्साही तरुण मोबाईलवर हल्ल्याचे शूटिंग करीत होते, तर काहीजण आरडाओरड करत होते. यावेळी पन्नास लोकांचा समूह एका रस्त्याने गव्यांच्या मागावर होता. त्यावेळी गोंगाटाने बिथरलेल्या गव्याने अचानक लोकांवर हल्ला केला. त्यातच पत्रकाराचा मृत्यू झाला.