शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

गव्याच्या हल्ल्यात दोघे ठार

By admin | Updated: May 13, 2017 00:53 IST

गव्याच्या हल्ल्यात दोघे ठार

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी (जि. कोल्हापूर) : आकुर्डे (ता. भुदरगड) येथे शुक्रवारी सकाळी गव्याच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधीही गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. अनिल पांडुरंग पोवार (वय ४४, रा. आकुर्डे) व बी न्यूज वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी रघुनाथ महादेव शिंदे (५२, रा. गारगोटी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. बिथरलेल्या गव्याच्या थैमानामुळे गारगोटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी सकाळी आकुर्डे येथील तीन तरुण शेतकरी वैरण आणण्यासाठी ‘भैरुचा माळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात गेले होते. उसाचा पाला काढत असताना गव्याच्या कळपातून चुकलेल्या मोठ्या गव्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये तिघांपैकी दोघे पळून गेले. तर अनिल पोवार या तरुणावर गव्याने हल्ला केला. अनिल यांच्या पोटात शिंग घुसून रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य हल्ल्यातून बचावलेल्या दोघांनी ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान, कोल्हापूरच्या एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी रघुनाथ शिंदे दुपारी बाराच्या दरम्यान घटनास्थळी गेले. यावेळी पन्नास लोकांचा समूह एका रस्त्याने गव्यांच्या मागावर होता. त्यावेळी गोंगाटाने बिथरलेल्या गव्याने अचानक लोकांवर हल्ला केला. रघुनाथ शिंदे शेताच्या बांधावर उभे राहून गव्याचे शूटिंग करत असताना गव्याने मागे फिरून त्यांना धडक दिली. या हल्ल्यात शिंदे यांच्या पोटात एक शिंग घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. शिंदे यांना मोटारसायकलवरून गारगोटी येथे आणले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक करून तातडीने कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृत अनिल पोवार हे आकुर्डे येथील दत्तगुरू दूध संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले आहेत. तर मृत रघुनाथ शिंदे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परिवार आहे. पाण्यासाठी गवे शिवारात घुसलेजंगलातील गवे सध्या पाण्याच्या शोधासाठी शिवारात घुसल्याने नागरिकांनी सतर्क रहावे. शेतात, पाण्याच्या जवळ जाताना सावधानता बाळगावी. कोणत्याही परिस्थितीत त्याला हुसकवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी बचावात्मक पवित्रा घ्या असे आवाहन परिक्षेत्र वन अधिकारी अशोक पाटील, वनक्षेत्रपाल भुदरगड यांनी केले आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून....गव्यापासून बचावासाठी काही लोक दहा फूट उंचीच्या बांधावर उभे होते. अचानक गवा बांधावर चढल्याने तारांबळ उडाली. यावेळी गव्याने दिशा बदलली. त्यावेळी विठ्ठल कुंभार बांधावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून गवा गेला. त्याचवेळी समोर शूटिंग करत असलेल्या पत्रकार रघुनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला, पण केवळ दैव बलवत्तर म्हणून चार-पाचजणांचा जीव वाचला.जमावाच्या गोंगाटाने गवे बिथरलेगेल्या काही दिवसांपासून गव्याचा कळप या परिसरात आहे. शुक्रवारी सकाळी अनिल पोवार यांच्या मृत्यूनंतर परिसरातील ग्रामस्थांचा जमाव घटनास्थळी जमला. गव्याच्या मागावर हा जमाव होता. जमावातील काहीजण आरडाओरड करत होते. जमावाच्या गोंगाटामुळेच गवे बिथरले असण्याची शक्यता आहे. मोबाईलवरुन शूटिंगचा असुरी आनंदघटनास्थळावर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. झाडावर बसून काही तरुण या गव्यांची टेहळणी करत होते. गवा हल्ला करीत असताना काही उत्साही तरुण मोबाईलवर हल्ल्याचे शूटिंग करीत होते, तर काहीजण आरडाओरड करत होते. यावेळी पन्नास लोकांचा समूह एका रस्त्याने गव्यांच्या मागावर होता. त्यावेळी गोंगाटाने बिथरलेल्या गव्याने अचानक लोकांवर हल्ला केला. त्यातच पत्रकाराचा मृत्यू झाला.