शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

दोन्ही काँग्रेसनी एकत्र राहणं हिताचं - दिग्विजय सिंग

By admin | Updated: August 21, 2014 10:37 IST

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपले सर्व व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर : आगामी काळातील राजकीय लढाई ही व्यक्तिकेंद्रित नसून एका विचारसरणीची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपले सर्व व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने एकत्र येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे सरचिटणीस खासदार दिग्विजय सिंग यांनी आज, बुधवारी दुपारी येथे बोलताना केले. धर्मावर आधारित द्वेषभावना निर्माण करून जातीयवादी पक्षांनी देशाला फसविले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथे राजीव गांधी सद्भावना दौडची सांगता आणि त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिग्विजय सिंग बोलत होते. यावेळी राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंतराव थोरात यांना ‘भारतरत्न राजीव गांधी सद्भावना पुरस्कार’ देऊन दिग्विजय सिंग यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाराष्ट्रात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आहे. कधी-कधी त्यात बिघाडी होण्यापर्यंत मजल जाते. त्याचा फटका सगळ्यांनाच बसतो; परंतु भविष्यात अशी बिघाडी होणे दोन्ही पक्षांच्या दृष्टीने हिताचे नाही. जेथे लालूप्रसाद यादव व नितीशकुमार एकत्र येत असतील तेथे महाराष्ट्रात कॉँग्रेस व राष्ट्रवादीला एकत्र येणे आवश्यकच आहे. जर आपण एकत्र आलो नाही तर धर्मावर आधारित समाजात द्वेष पसरविणाऱ्या शक्तींचा उन्माद अधिकच वाढेल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या इमानदार नेत्यांनी महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.