शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
6
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
7
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
8
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
9
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
10
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
11
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
12
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
13
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
14
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
15
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
16
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
17
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
18
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
19
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
20
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...

दोन्ही काँग्रेसनी एकत्र राहणं हिताचं - दिग्विजय सिंग

By admin | Updated: August 21, 2014 10:37 IST

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपले सर्व व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर : आगामी काळातील राजकीय लढाई ही व्यक्तिकेंद्रित नसून एका विचारसरणीची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपले सर्व व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने एकत्र येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे सरचिटणीस खासदार दिग्विजय सिंग यांनी आज, बुधवारी दुपारी येथे बोलताना केले. धर्मावर आधारित द्वेषभावना निर्माण करून जातीयवादी पक्षांनी देशाला फसविले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथे राजीव गांधी सद्भावना दौडची सांगता आणि त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिग्विजय सिंग बोलत होते. यावेळी राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंतराव थोरात यांना ‘भारतरत्न राजीव गांधी सद्भावना पुरस्कार’ देऊन दिग्विजय सिंग यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाराष्ट्रात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आहे. कधी-कधी त्यात बिघाडी होण्यापर्यंत मजल जाते. त्याचा फटका सगळ्यांनाच बसतो; परंतु भविष्यात अशी बिघाडी होणे दोन्ही पक्षांच्या दृष्टीने हिताचे नाही. जेथे लालूप्रसाद यादव व नितीशकुमार एकत्र येत असतील तेथे महाराष्ट्रात कॉँग्रेस व राष्ट्रवादीला एकत्र येणे आवश्यकच आहे. जर आपण एकत्र आलो नाही तर धर्मावर आधारित समाजात द्वेष पसरविणाऱ्या शक्तींचा उन्माद अधिकच वाढेल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या इमानदार नेत्यांनी महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.