शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

मंगळवारच्या ‘भारत बंद’ ला शिवसेनेसह दोन्ही कॉग्रेसनी पाठिंबा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:02 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या व शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी मंगळवारी (दि. ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या व शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी मंगळवारी (दि. ८) ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय झाला. या बंदला महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा द्यावा, असे आवाहन किसान सभेने केले आहे.

देशातील ५०० हून अधिक शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात समविचारी शेतकरी संघटना तसेच कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व समाजसेवी संघटनांचा समन्वय करून ‘भारत बंद’च्या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी करण्यासाठी किसान सभेने प्रयत्न सुरू केले आहेत.

महाराष्ट्रातील भाजप सोडून उर्वरित सर्वच राजकीय पक्षांनी बंदच्या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ ठेवून शेतकऱ्यांना समर्थन द्यावे व बंद यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे आंदोलनात उतरावे, असे आवाहन किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केले आहे.