शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

सीमा आंदोलन; हुतात्म्यांच्या वारसांना न्याय

By admin | Updated: May 6, 2015 00:19 IST

निवत्तिवेतनात वाढ : सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय; राज्यातील चौदाजणांना लाभ

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य आलेल्या वारसांच्या निवृत्तिवेतनात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. वाढीव वेतनाप्रमाणे आता दरमहा १० हजार रुपये मिळणार आहेत. एप्रिल आणि मे महिन्यांसाठी चौदा वारसांसाठी तीन लाख ४३ हजार रुपये संबंधित जिल्हा प्रशासनाकडे शासनाने २७ एप्रिल २०१५ रोजी वितरित केले आहेत. यासंबंधीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रि. इ. शेख यांनी पाठविला आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी १९५६ मध्ये लढा तीव्र झाला होता. त्यानंतर १९५६ मध्ये कन्नडसक्तीच्या विरोधात आंदोलन व्यापक बनले. या दोन्ही आंदोलनांत मृत्यू पावलेल्यांना शासनाने हुतात्मे म्हणून घोषित केले. हुतात्म्यांच्या हयात पत्नी, आई, वडील यांपैकी एकास पहिल्यांदा एक हजार रुपये मासिक वेतन दिले जात होते. सन १९९९ मध्ये ते पंधराशे करण्यात आले. त्यानंतर २०१० मध्ये दरमहा ते आठ हजार रुपये करण्यात आले. २१ एप्रिल २०१५ रोजी पुन्हा दोन हजारांची वाढ करून दरमहा दहा हजार रुपये करण्यात आले आहे. ही वाढ २ आॅक्टोबर २०१४ पासून दिली जाणार आहे. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत दरमहा हे वेतन वितरित केले जाते. वाढीव निवृत्तिवेतनानुसार सन २०१५-१६ सालाची एकूण २० लाख ६३ हजार रक्कम देय आहे. यातील एप्रिल आणि मे या दोन महिन्यांसाठी ३ लाख ४२ हजार रुपये संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शासनाने वितरित केले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील नऊ हुतात्म्यांच्या वारसांना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हे निवृत्तिवेतन वितरित केले जाते. चार वर्षांनंतर शासनाने दोन हजारांची वाढ केल्यामुळे वारसांतून समाधान व्यक्त केले जात आहे.शासनाने नियमित वाढीतून दोन हजारांची वाढ हुतात्म्यांच्या वारसांना केली आहे. मात्र, प्रत्यक्षात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्मे झाले असताना १४ वारसांना निवृत्तिवेतन दिले जाते, ही खेदाची बाब आहे. बेळगाव जिल्ह्यातील नऊ वारसांना निवृत्तिवेतन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून दिले जाते. आणखी पाच हुतात्म्यांच्या वारसांना मदत मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- मालोजी अष्टेकर, नेते, महाराष्ट्र एकीकरण समिती (बेळगाव)