शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बंधारे दुरुस्तीचे ७६ लाख हवेतच

By admin | Updated: October 5, 2015 00:49 IST

वर्ष उलटले तरी नुसतेच मंजुरीपत्र : आठ बंधारे मोजतात अखेरची घटका

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावर बांधलेल्या आठ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी कॉँग्रेस आघाडी सरकारने ‘खास बाब’ म्हणून मंजूर केलेला निधी हवेतच आहे. वर्ष उलटले तरी नुसती ७६ लाख मंजूर निधीची पत्रेच संस्थांच्या हातात आहेत. निधी न मिळाल्याने हे बंधारे दुरुस्तीअभावी अखेरच्या घटका मोजत आहेत. पन्नास-साठ वर्षांपूर्वी शेतीला पाणी अडविण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत सहकारी संस्थांच्या माध्यमातून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची (केटीवेअर) उभारणी केली. कोल्हापूर जिल्हा सुजलाम् सुफलाम् होण्यास या बंधाऱ्यांचे योगदान मोठे आहे. शेतकऱ्यांना माफक दरात पाणीपुरवठा करणे एवढाच या सहकारी संस्थांचा हेतू राहिल्याने नफ्याचा विषय लांबच राहिला. बंधाऱ्याच्या बांधकामाला ३५-४० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याची पडझड सुरू झाली; पण संस्थांचे उत्पन्नच नसल्याने बंधाऱ्यांची डागडुजी करणे अडचणीचे ठरू लागले. यावर्षी दुरुस्ती करू; पुढच्या वर्षी करू, असे करीत-करीत दहा-पंधरा वर्षे झाल्याने बंधाऱ्याचा एक-एक पिलर कोसळू लागला. पिलर कमकुवत झाल्याने बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठेना. बहुतांश पाणी वाहून जाऊ लागल्याने या बंधाऱ्यांच्या परिसरातील पिके अडचणीत येऊ लागली.या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासकीय पातळीवर अनेक वेळा प्रयत्न झाले; पण सहकारी संस्थांच्या मालकीचे बंधारे असल्याने त्यांना शासकीय निधी देता येत नव्हता. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. सांगरूळच्या बंधाऱ्यासाठी दिवंगत नेते दिग्विजय खानविलकर यांनी निधीसाठी प्रयत्न केला; पण त्यात यश आले नाही. त्यानंतर पाच-सहा वर्षे संस्थांनी शासनपातळीवर प्रयत्न केले. कॉँग्रेस आघाडी सरकारच्या शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी आली. जिल्ह्णातील धरणसंस्थांनी त्यांच्याकडे निधीचा पाठपुरावा केला आणि हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्णातील कोगे, सांगरूळ, कळे, तिरपण, सिद्धनेर्ली, सुरूपली, बाचणीसह सहकार तत्त्वावरील आठ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल ७६ लाखांचा निधी मंजूर केला. तो मंजूर झाल्याने ऐेतिहासिक बंधाऱ्यांना नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा संस्थाचालकांना होती; पण निधी मंजुरीची पत्रे हातात आली आणि राज्यातील आघाडी सरकार गेले. त्यानंतर आलेल्या महायुतीच्या सरकारने वर्ष झाले तरी मंजूर निधीतील एक दमडीही संस्थांना दिलेली नसल्याने बंधाऱ्यांना अखेरची घरघर लागली आहे. जिल्ह्णात सहा शिवसेनेचे, दोन भाजपचे आमदार असताना याबाबत कोणीच शासन-दरबारी प्रयत्न करीत नसल्याने संस्थांबरोबर ऐतिहासिक ठेवेही अडचणीत आले आहेत. ऐतिहासिक ठेवा ढासळणारदेशातील सहकार तत्त्वावरील सांगरूळचे या पहिल्या धरणाला ६५ वर्षे झाल्याने त्याचे आयुष्य संपले आहे. ‘केटीवेअर’चा जन्मच या धरणातून झाला, पण दुरुस्तीअभावी हा ऐतिहासिक ठेवा ढासळण्याच्या स्थितीत आहे. धरणसंस्थांची अडचण लक्षात घेऊन जलसंपदामंत्री असताना खास बाब म्हणून आठ बंधाऱ्यांना निधी मंजूर केला; पण सत्ता बदलल्यानंतर हा निधी थांबल्याने बंधारे अडचणीत आले आहेत. याबाबत जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करू. - आमदार हसन मुश्रीफ (माजी जलसंपदा मंत्री) गेले वर्षभर या निधीसाठी आम्ही शासनपातळीवर प्रयत्न करीत आहोत; पण कोणी दादच देत नाही. पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली तर ‘निधीच आलेला नाही तर देऊ कोठून?’ असे विचारले जाते. - उत्तम कासोटे ( संचालक, कुंभी नदी धरण संस्था)