शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

कोल्हापुरात रक्ताची टंचाई, रक्तदानासाठी पुढे या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला राेज सरासरी २५० बाटल्या रक्ताची गरज आहे, मात्र त्याप्रमाणात रक्तदान होत नसल्याने नियमित रक्ताची गरज ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला राेज सरासरी २५० बाटल्या रक्ताची गरज आहे, मात्र त्याप्रमाणात रक्तदान होत नसल्याने नियमित रक्ताची गरज असलेले रुग्ण, गरोदर माता, अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया करावे लागणारे रुग्ण यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, या सामाजिक कार्याचे पाईक म्हणून ‘लोकमत’ने सुरू केलेल्या रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना व आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ब्लड बँकांमध्ये रक्ताच्या पिशव्या अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी १८ ते ६५ वयोगटातील व वजन किमान ४५ किलोपेक्षा जास्त असेल अशा सर्व नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे आहे. अनेकदा १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, गणेशोत्सव अशा विविध उत्सवांच्यादरम्यान रक्तदान केले जाते. त्याकाळात रक्ताची फारशी कमतरता भासत नाही; मात्र इतरवेळी विशेषत: सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात रक्ताची मागणी अधिक आहे.

---

जिल्ह्यातील एकूण बल्ड बँका : १३

रोजची रक्ताची गरज : २५० बाटल्या

शिल्लक रक्त : १ हजार २०५ बाटल्या

----

चार प्रकारे वापर

संकलित केलेल्या रक्ताच्या ७ प्रकारच्या चाचण्या केल्या जातात, त्यात दोष आढळला तर त्याचा वापर केला जात नाही. एका रक्ताच्या पिशवीचा चार वेगवेगळ्या कारणांसाठी वापर होतो. प्लेटलेट पेशी ज्यांचा वापर डेंग्यू, कॅन्सरग्रस्तसारख्या रुग्णांवर केला जातो. तांबड्या पेशी सर्व प्रकारचे रुग्ण, प्रसूती, अपघातग्रस्त, विविध शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया, ॲनिमिया अशा कारणांसाठी उपयुक्त असते. प्लाझ्माचा वापर जळणे, हृदयशस्त्रक्रिया, नवजात बालके, जीबी सिंड्रोम आजार असलेल्यांसाठी होतो. तर क्राईव्ह प्रेसिपेट याचा वापर अंतर्गत रक्तस्त्राव होत असेल तर केला जातो.

---

महिलांचे रक्तदानाचे प्रमाण कमी

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे रक्तदानाचे प्रमाण कमी आहे. महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते. अनियमित मासिक पाळी, सकस अन्नाचा अभाव अशा कारणांमुळे अनेकदा सरासरी टक्केवारीपर्यंत महिलांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढत नाही. भारतात महिलांचे रक्तदानाचे प्रमाण केवळ ६ टक्के इतके आहे.

-