शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

रंकाळ्याला दूषित पाण्याचा विळखा

By admin | Updated: November 22, 2014 00:04 IST

ड्रेनेजलाईन चोकअप : पुन्हा जलपर्णीचा धोका

कोल्हापूर : रंकाळ्यात मिसळणाऱ्या शाम सोसायटी, सरनाईक कॉलनी, परताळा नाल्यातील ११ ते १२ एमएलडी मैलामिश्रीत सांडपाण्यापैकी तब्बल २२१० एमएलडी सांडपाणी दुधाळी नाल्याकडे वळविल्याचा मनपाचा दावा फोल ठरला आहे. सव्वाचार कोटी रुपये खर्चून टाकलेली ड्रेनेजलाईन पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. पाईपमधील खरमाती काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच रंकाळ्याची सांडपाण्यातून मुक्तता होईल. सांडपाण्यामुळे रंकाळ्याला पुन्हा जलपर्णीचा धोका वाढल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्याची राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून महापालिकेला ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला. साडेचार वर्षे ही योजना रखडली. रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका येथील ड्रेनेजसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम कासवगतीने झाल्याने दुखणे वाढतच गेले. जुलै २०१४ मध्ये नाल्यातील पाणी वळविल्याचा दावा प्रशासनाने केला. मात्र, अद्यापही रंकाळ्यात सांडपाणी मिसळत आहे. पद्माराजे उद्यानाच्या पाठीमागे पाईपमधील खरमाती काढण्यासाठी तीन-चार ठेकेदारांनी प्रयत्न करूनही पाईप पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. तरी पाईपलाईन सुरळीत झाल्याचे जाहीर केले. सरनाईक कॉलनी नाल्यातील एक ते दीड एमएलडी सांडपाणी वळविण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)जुजबी प्रयत्नरंकाळ्यात सरनाईक कॉलनीतून मिसळणारे पाणी रोखण्यासाठी मातीची पोती भरून दूषित पाणी वेगळे करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. या पाण्याला दुर्गंधी व जलपर्णी वाढली आहे. हे पाणी केव्हाही रंकाळ्यात मिसळू शकते, अशी अवस्था आहे. अशा जुजबी प्रयत्नांवरच प्रशासनाची भिस्त असल्याने त्याचा फटका बसू शकतो, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.स्वच्छतेचा बोजवारारंकाळा पदपथ उद्यानात सात ते आठ कर्मचारी आहेत; पण उद्यानात स्वच्छता दिसून येत नाही. कचरा कुंडीची योग्य व्यवस्था नाही. पर्यटकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. महापालिकेने तीनवेळा रंकाळ्यासाठी एक दिवस ही स्वच्छता मोहीम राबविली; पण त्याची नित्य स्वच्छता होणे गरजेचे आहे.