शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

संकटांना धैर्याने सामोरे जाणारे जिगरबाज अंध दाम्पत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:46 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : त्या अंध शिक्षिका आहेत, त्या मुलांना कसं चांगलं शिकवतील म्हणून जिल्हा ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : त्या अंध शिक्षिका आहेत, त्या मुलांना कसं चांगलं शिकवतील म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत रूजू होतानाच जे पालक विरोध करतात तेच पालक त्याच शिक्षिकेची बदली झाल्यावर मात्र आम्हाला याच शिक्षिका हव्यात म्हणून त्यांच्या बदलीस विरोध करतात, असा अनुभव संगीता पुंड-निकम यांना येत आहे. त्यातून त्यांची गुणवत्ताच सिद्ध झाली आहे. संकटे कितीही आली तरी मोडून न पडता त्याला सामोरे जाऊन जीवन कसे सुंदर करता येते याचा वस्तुपाठच भारत व संगीता या शंभर टक्के अंध दाम्पत्याने घालून दिला आहे.भारत निकम रोज सकाळी सहा वाजता उठून कोल्हापूर ते मिरज असा रेल्वे प्रवास करतात आणि अधीक्षक म्हणूनही त्यांनी कामाची वेगळी छाप पाडली आहे. राज्यात २१ शासकीय अपंग बालगृहे व शाळा आहेत. त्यापैकी पूर्णत: अंध असणारे हे एकमेव अधीक्षक आहेत. त्यांनी मिरज येथील शाळेला ‘आयएसओ मानांकन’ मिळवून दिले आहे. असे मानांकन मिळालेली ही पहिली शासकीय शाळा आहे. शाळेत अर्ली इंटरव्हेंशन केंद्र आहे. पहिले ई- लर्निंग सेंटरही त्यांनी सुरू केले आहे. या शाळेच्या व्हीलचेअर बास्केटबॉल संघाने राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.भारत मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे. संगीता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या. त्यांनाही परिस्थितीशी कायम संघर्ष करावा लागला. त्या जन्माने अंध नाहीत. त्यांचा १९९७ ला अपघात झाला, त्यात त्यांना कायमचे अंधपण आले. त्यानंतर त्यांनी पुण्यात जाऊन डी.एड्. केले. श्रीरामपूरला ‘नॅब’च्या शाळेत पाच वर्षे शिक्षिका म्हणून काम केले. भारत यांनी त्यांच्या नोकरीसाठी बरीच खटपट केल्यावर संगीता यांना कोल्हापूर महापालिकेत नोकरी मिळाली. अहिल्याबाई प्राथमिक विद्यामंदिरात २२ विद्यार्थ्यांना त्या शिकवू लागल्या. अपंगांसाठी असलेली योजना बंद झाल्याने त्यांचे समायोजन जिल्हा परिषदेत झाले. त्यांना कबनूर शाळेत नोकरी मिळाली; परंतु त्यांना तिथे हजर करून घेण्यास विरोध झाला. आम्ही त्यांचा वर्ग सांभाळणार नाही, लेखन करणार नाही, असा पवित्रा सहशिक्षकांनी घेतला; परंतु जेव्हा त्यांची पाच वर्षांनंतर बदली झाली तेव्हा मुलींनी आम्हाला याच बाई पाहिजेत; म्हणून हंबरडा फोडला. वाशी (ता. करवीर) येथे बदली झाल्यावर तिथेही त्यांना हजरच करून घेतले नाही. फारच दबाव आल्यावर मग मुख्याध्यापिकेने त्यांना दुसरीचा वर्ग दिला. अशी अंधबाई आमच्या मुलांना काय शिकवणार, पिढी बरबाद होईल, अशा तक्रारी झाल्या. त्यांनी अध्यापनाचे काम सुरूच ठेवले. आता त्याच वर्गातील मुले विविध परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवू लागली आहेत. चौथीच्या मुलांच्या पालकांनी आमच्या मुलांना याच बाई शिकवू देत म्हणून आग्रह धरला. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल त्यांचा अंजनाबाई लहाने पुरस्काराने नुकताच गौरव झाला आहे.