शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

भाजपचे अस्तित्व पणाला

By admin | Updated: June 27, 2016 00:37 IST

जयसिंगपूर बाजार समिती निवडणूक : भाजप विरुद्ध सर्व पक्ष-गट एकत्र

गणपती कोळी -- कुरुंदवाड जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला जोर चढला आहे़ भाजप विरुद्ध सर्व पक्ष-गट अशी लढत लागली आहे़ भाजप आघाडीचे नेतृत्व मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ़ संजय पाटील हे करीत असून, या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना राजकीय पुनरागमनाची सिद्धता सिद्ध करण्याचे, तर भाजपला निवडणुकीतील वजाबाकीचा हिशेब चुकता करण्याचे आव्हान आहे़ यामध्ये दोघेही कितपत यशस्वी होतात़, यावरच त्यांचे तालुक्यातील राजकीय अस्तित्व सिद्ध होणार आहे़ लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर तब्बल एक तपाहून अधिक काळ राजकीय वनवासानंतर डॉ़ संजय पाटील यांनी हातामध्ये कमळ घेऊन पुन्हा राजकीय श्रीगणेशाला सुरुवात केली आहे़ डॉ़ पाटील यांचा सहकार व सहकार्याच्या माध्यमातून तालुक्यात चांगलाच गट होता़ मात्र, १२ वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही काळ राजकीय संन्यास घेतल्याने व सहकाराच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने कार्यकर्त्यांचा संपर्क तुटला़ त्यामुळे त्यांचे बरेच कार्यकर्ते इतर गटांत विखुरले गेले़ गत विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत डॉ़ पाटील यांनी हातात कमळ घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला़ राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्याने डॉ़ पाटील यांचा आत्मविश्वास वाढला असून, तालुक्याच्या राजकारणात ते पुन्हा सक्रिय झाले आहेत़ अवघ्या सहा महिन्यांत कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक होणार असून, त्याची चाचपणीही त्यांनी चालू केली आहे़ त्यातच जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध निवडीत भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली होती़ मात्र, केवळ भाजपला वगळून यड्रावकर, सा़ रे़ पाटील गट, स्वाभिमानी संघटना, शिवसेना एकत्र आल्याने व भाजपचा इगो दुखावल्याने निवडणूक लागली आहे़ भाजप : आर-पारची लढाई होणार भाजप आघाडीचे नेतृत्व डॉ़ पाटील करीत असून, निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणातील त्यांच्या पुनरागमनातील ताकद सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे़ शिवाय केंद्रात, राज्यात भाजप शासन असताना बिनविरोध प्रस्तावात भाजपला प्रस्तापितांनी शिवूनही न घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांबरोबर नेत्यांचाही इगो दुखावला आहे़ या अपमानाचा वचपा काढून हिशेब चुकता करण्यासाठी भाजपला आर-पारची लढाई लढावी लागणार आहे़ यामध्ये मतदारांचे मतपरिवर्तन करण्यात कितपत यशस्वी होतात, यावरच डॉ़ पाटील व भाजपचे तालुक्यातील राजकीय वर्चस्व स्पष्ट होणार आहे़