शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे अस्तित्व पणाला

By admin | Updated: June 27, 2016 00:37 IST

जयसिंगपूर बाजार समिती निवडणूक : भाजप विरुद्ध सर्व पक्ष-गट एकत्र

गणपती कोळी -- कुरुंदवाड जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला जोर चढला आहे़ भाजप विरुद्ध सर्व पक्ष-गट अशी लढत लागली आहे़ भाजप आघाडीचे नेतृत्व मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ़ संजय पाटील हे करीत असून, या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना राजकीय पुनरागमनाची सिद्धता सिद्ध करण्याचे, तर भाजपला निवडणुकीतील वजाबाकीचा हिशेब चुकता करण्याचे आव्हान आहे़ यामध्ये दोघेही कितपत यशस्वी होतात़, यावरच त्यांचे तालुक्यातील राजकीय अस्तित्व सिद्ध होणार आहे़ लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर तब्बल एक तपाहून अधिक काळ राजकीय वनवासानंतर डॉ़ संजय पाटील यांनी हातामध्ये कमळ घेऊन पुन्हा राजकीय श्रीगणेशाला सुरुवात केली आहे़ डॉ़ पाटील यांचा सहकार व सहकार्याच्या माध्यमातून तालुक्यात चांगलाच गट होता़ मात्र, १२ वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही काळ राजकीय संन्यास घेतल्याने व सहकाराच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने कार्यकर्त्यांचा संपर्क तुटला़ त्यामुळे त्यांचे बरेच कार्यकर्ते इतर गटांत विखुरले गेले़ गत विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत डॉ़ पाटील यांनी हातात कमळ घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला़ राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्याने डॉ़ पाटील यांचा आत्मविश्वास वाढला असून, तालुक्याच्या राजकारणात ते पुन्हा सक्रिय झाले आहेत़ अवघ्या सहा महिन्यांत कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक होणार असून, त्याची चाचपणीही त्यांनी चालू केली आहे़ त्यातच जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध निवडीत भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली होती़ मात्र, केवळ भाजपला वगळून यड्रावकर, सा़ रे़ पाटील गट, स्वाभिमानी संघटना, शिवसेना एकत्र आल्याने व भाजपचा इगो दुखावल्याने निवडणूक लागली आहे़ भाजप : आर-पारची लढाई होणार भाजप आघाडीचे नेतृत्व डॉ़ पाटील करीत असून, निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणातील त्यांच्या पुनरागमनातील ताकद सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे़ शिवाय केंद्रात, राज्यात भाजप शासन असताना बिनविरोध प्रस्तावात भाजपला प्रस्तापितांनी शिवूनही न घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांबरोबर नेत्यांचाही इगो दुखावला आहे़ या अपमानाचा वचपा काढून हिशेब चुकता करण्यासाठी भाजपला आर-पारची लढाई लढावी लागणार आहे़ यामध्ये मतदारांचे मतपरिवर्तन करण्यात कितपत यशस्वी होतात, यावरच डॉ़ पाटील व भाजपचे तालुक्यातील राजकीय वर्चस्व स्पष्ट होणार आहे़