शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराचे उच्चाटन हाच भाजपचा कार्यक्रम

By admin | Updated: August 18, 2015 22:11 IST

भाई जगताप यांचा आरोप : मुरगूड येथे विश्वनाथराव पाटील स्मृतिदिन

मुरगूड : सत्तेवर आलेल्या सरकारने सहकार समजून घेतलाच नाही. सहकार क्षेत्रावर काँग्रेसची घट्ट पकड आहे. त्यामुळेच या अधिवेशनामध्ये सहकाराचे उच्चाटन कसे करता येईल, यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. सहकार आणि काँग्रेसचे उच्चाटन करण्याचा एक कलमी कार्यक्रमच त्यांनी हातात घेतला आहे; पण सहकाराकडे सत्ताधिशांनो वाकडी नजर केलात, तर शेतकरीच तुम्हाला शेतात गाडेल, असा सज्जड दम कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी दिला. मुरगूड (ता. कागल) येथे सहकार महर्षी विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेच्यावतीने आयोजित ‘सहकार आणि आजचे सरकार’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते. यावेळी माजी आम. बजरंग देसाई, माजी आम. नामदेवराव भाईटे, दादा जगताप, रणजितसिंह पाटील, प्रविणसिंह पाटील, नगराध्यक्षा वसुधा कुंभार उपस्थित होते. दलितमित्र डी. डी. चौगले यांनी प्रास्ताविक केले.माजी आम. बजरंग देसाई, रणजितसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वसंतराव शिंदे, नावेद मुश्रीफ, श्रीपती पाटील, विश्वास चौगले, साताप्पा पाटील, संतोष वंडकर, विजय शेट्टी, एम. डी. रावण, मारुती कांबळे, धनंजय मिसाळ, संजय हावळ उपस्थित होते. (वार्ताहर)‘भाजप’ची क्रॉप्टनीती--सहकार क्षेत्रावर यांची पकड नसल्याने विविध संस्थांमध्ये घुसण्याची नवीन पद्धत या सरकारने अवलंबली आहे. मोठमोठ्या संस्थेत यांचे प्रतिनिधी आता क्रॉप्ट करून घुसत आहेत; पण चांगल्या संस्थांमध्ये मिठाचा खडा टाकून सहकारामध्ये बाधा येईल, असेही जगताप यांनी सांगितले.सहकारमंत्र्यांमुळेच साखरेचा दर उतरलामहाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन होत असताना सहकारमंत्र्यांनी बाहेरून चाळीस हजार टन साखर आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळेच साखर दरात कमालीची घसरण झाली. सूडभावनेने जर हे सरकार वागल,े तर सहकार उद्ध्वस्त होईल, असा इशारा भाई जगताप यांनी दिला.