शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
3
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
4
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
5
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
6
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
7
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
8
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
9
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
10
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
12
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
13
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
14
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
15
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
16
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
17
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
18
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
19
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
20
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

महाडिकांचे सहकार्य घेण्याबाबत भाजप संभ्रमात--पालकमंत्र्यांची सावध भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 14:14 IST

राजकारणातील वाऱ्याची दिशा पाहून भूमिका ठरविणाºया महादेवराव महाडिक यांची मदत विधानसभेच्या निवडणुकीत घ्यायची की नाही, याबाबत भाजप संभ्रमास्थेत असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. लोकसभेच्या निवडणूक निकालांचे विश्लेषण केल्यानंतरच महाडिक यांची मदत घ्यायची की नाही, हे ठरवावे लागेल.

ठळक मुद्देमी एकटा ठरविणार नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा करावी लागेल.

कोल्हापूर : राजकारणातील वाऱ्याची दिशा पाहून भूमिका ठरविणाºया महादेवराव महाडिक यांची मदत विधानसभेच्या निवडणुकीत घ्यायची की नाही, याबाबत भाजप संभ्रमास्थेत असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. लोकसभेच्या निवडणूक निकालांचे विश्लेषण केल्यानंतरच महाडिक यांची मदत घ्यायची की नाही, हे ठरवावे लागेल. आताच त्याबाबत भूमिका सांगता येणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप आणि महादेवराव महाडिक यांचे गेल्या पाच वर्षांतील राजकीय संबंध अतिशय चांगले होते. महाडिक यांच्या साथीनेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच अन्य नगरपालिका निवडणुका लढविल्या. त्यात त्यांना बरेच यशही मिळाले होते. जिल्हा परिषदेत भाजपने अध्यक्षपद मिळविले. महापालिकेतही बरेच नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे सुरुवातीला मंत्री पाटील यांचा धनंजय महाडिक यांनाच छुपा पाठिंबा असल्याचा संशय व्यक्त केला जात होता; परंतु हा संशय खोटा होता, हे निकालावरून स्पष्ट झाले.

हाच संदर्भ घेऊन पालकमंत्री पाटील यांना प्रश्न विचारून बोलते करण्यात आले. ज्या महाडिकांना कोल्हापूरच्या जनतेने नाकारले आहे, त्यांना सोबत घेऊन विधानसभेची तयारी करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा मंत्री पाटील यांनी सावध उत्तर दिले. महाडिक गटाशी आमचे संबंध होते आणि यापुढेही राहतील; पण राजकीयदृष्ट्या संबंध ठेवायचे की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करावे लागेल. शिवाय मी एकटा ठरविणार नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा करावी लागेल. 

शेट्टींना उद्धटपणा नडला : पालकमंत्रीराजू शेट्टी यांचा पराभव होणारच होता; कारण ज्यांनी शेतकऱ्यांची आणि शेतकरी चळवळीची वाट लावली, त्या कॉँग्रेस-राष्टवादीशी मांडीला मांडी लावून बसण्याची शेट्टी यांची भूमिका शेतकºयांना आवडली नाही. भाजपबरोबरची साथ जर शेट्टी यांनी सोडली नसती, तर कदाचित विरोधाची धार थोडी कमी झाली असती. त्यांना त्यांचा उद्धटपणा, प्रत्येकाचा अपमान करण्याची त्यांची वृत्ती नडली, असे मंत्री पाटील म्हणाले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक