शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

महाडिकांचे सहकार्य घेण्याबाबत भाजप संभ्रमात--पालकमंत्र्यांची सावध भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 14:14 IST

राजकारणातील वाऱ्याची दिशा पाहून भूमिका ठरविणाºया महादेवराव महाडिक यांची मदत विधानसभेच्या निवडणुकीत घ्यायची की नाही, याबाबत भाजप संभ्रमास्थेत असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. लोकसभेच्या निवडणूक निकालांचे विश्लेषण केल्यानंतरच महाडिक यांची मदत घ्यायची की नाही, हे ठरवावे लागेल.

ठळक मुद्देमी एकटा ठरविणार नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा करावी लागेल.

कोल्हापूर : राजकारणातील वाऱ्याची दिशा पाहून भूमिका ठरविणाºया महादेवराव महाडिक यांची मदत विधानसभेच्या निवडणुकीत घ्यायची की नाही, याबाबत भाजप संभ्रमास्थेत असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. लोकसभेच्या निवडणूक निकालांचे विश्लेषण केल्यानंतरच महाडिक यांची मदत घ्यायची की नाही, हे ठरवावे लागेल. आताच त्याबाबत भूमिका सांगता येणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप आणि महादेवराव महाडिक यांचे गेल्या पाच वर्षांतील राजकीय संबंध अतिशय चांगले होते. महाडिक यांच्या साथीनेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच अन्य नगरपालिका निवडणुका लढविल्या. त्यात त्यांना बरेच यशही मिळाले होते. जिल्हा परिषदेत भाजपने अध्यक्षपद मिळविले. महापालिकेतही बरेच नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे सुरुवातीला मंत्री पाटील यांचा धनंजय महाडिक यांनाच छुपा पाठिंबा असल्याचा संशय व्यक्त केला जात होता; परंतु हा संशय खोटा होता, हे निकालावरून स्पष्ट झाले.

हाच संदर्भ घेऊन पालकमंत्री पाटील यांना प्रश्न विचारून बोलते करण्यात आले. ज्या महाडिकांना कोल्हापूरच्या जनतेने नाकारले आहे, त्यांना सोबत घेऊन विधानसभेची तयारी करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा मंत्री पाटील यांनी सावध उत्तर दिले. महाडिक गटाशी आमचे संबंध होते आणि यापुढेही राहतील; पण राजकीयदृष्ट्या संबंध ठेवायचे की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करावे लागेल. शिवाय मी एकटा ठरविणार नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा करावी लागेल. 

शेट्टींना उद्धटपणा नडला : पालकमंत्रीराजू शेट्टी यांचा पराभव होणारच होता; कारण ज्यांनी शेतकऱ्यांची आणि शेतकरी चळवळीची वाट लावली, त्या कॉँग्रेस-राष्टवादीशी मांडीला मांडी लावून बसण्याची शेट्टी यांची भूमिका शेतकºयांना आवडली नाही. भाजपबरोबरची साथ जर शेट्टी यांनी सोडली नसती, तर कदाचित विरोधाची धार थोडी कमी झाली असती. त्यांना त्यांचा उद्धटपणा, प्रत्येकाचा अपमान करण्याची त्यांची वृत्ती नडली, असे मंत्री पाटील म्हणाले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक