शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

थकीत ‘एफआरपी’त भाजप कारखानदार अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:17 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडे ५३०० कोटींची एफआरपी थकीत असून ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडे ५३०० कोटींची एफआरपी थकीत असून यामध्ये सर्वाधिक कारखाने हे भाजप व त्यांच्या सहयोगी पक्षांचे आहेत. ७३ सहकारी व खासगी कारखान्यांकडे तब्बल १५०५ कोटी थकीत असून त्यापाठोपाठ राष्टÑवादी कॉँग्रेसच्या ५३ कारखानदारांकडे १५०२ कोटी, तर कॉँग्रेसच्या ४४ कारखानदारांकडे १३४१ कोटी थकीत आहेत. थकबाकीच्या यादीत बहुतांश साखर कारखाने असले तरी इतर विभागांच्या तुलनेत कोल्हापूर विभागात थकबाकीचे प्रमाण काहीसे कमी आहे.केंद्र सरकारने यंदा एफआरपीच्या रकमेत थोडी वाढ केल्याने शेतकरी काहीसा खूश होता. तीन महिने एकसारखा पाऊस आणि त्यानंतर मारलेल्या दांडीने उसाचे उत्पादन घटणार ही चिंता घेऊनच यंदाचा हंगाम सुरू झाला. शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक २०० रुपयांची मागणी करीत आंदोलनाचे रणशिंग फुंकले. संघटनेसोबत तडजोड होऊन एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य करून हंगाम सुरू झाला. साखरेचे दर २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आल्याने एकरकमी एफआरपी देणे शक्य नसल्याचा सूर कारखानदारांनी आळवला. सरकारने मदत करावी, यासाठी शिष्टमंडळांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आणि त्यात हंगाम दोन महिने पुढे गेला. दोन महिने उलटले तरी दमडीही न मिळाल्याने ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले. ‘एफआरपी’चे तुकडे पाडून कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्यास सुरुवात केली आहे.राज्यात आतापर्यंत झालेले गाळप पाहता ५३०० कोटींची थकीत एफआरपी आहे. कारखानानिहाय आढावा घेतला तर सर्वाधिक थकबाकी ही सत्ताधारी भाजप व त्यांच्या सहयोगी पक्षांचीच अधिक आहे.त्यांच्या ७३ कारखान्यांकडे १५०५ कोटी थकीत आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. राष्टÑवादीच्या ५३ कारखान्यांकडे १५०२ कोटी, तर कॉँग्रेसच्या ४४ कारखान्यांकडे १३४१ कोटी थकीत एफआरपी आहे. शिवसेनेच्या १२ कारखान्यांकडे २८५ कोटी, तर निव्वळ व्यावसायिक (राजकीय पक्षाशी संबंध नसणारे) असणाºया १४ कारखान्यांकडे ७१० कोटी अडकले आहेत.पक्षनिहाय थकीत एफआरपी :पक्ष कारखान्यांची थकीतसंख्या एफआरपी कोटींतभाजप ७३ १५०५राष्ट्रवादी ५३ १५०२कॉँग्रेस ४४ १३४१व्यावसायिक १४ ७१०शिवसेना १२ २८५शेकाप 0१ ५.३०एकूण १८६ ५३२३एफआरपी थकविणाºया कारखान्यांत सर्वाधिक भाजप व त्यांच्या सहयोगी मंडळींचे कारखाने असल्यानेच सरकार कारवाई करीत नाही. आता सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. एक तर एफआरपी द्या, नाही तर साखर जप्त करण्याचे आदेश देण्यास भाग पाडू.- खासदार राजू शेट्टी