शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

विनासत्ता भाजपचा जिल्ह्यात लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST

कोल्हापूर : एकीकडे जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि दुसरीकडे कोल्हापूर महापालिकेसाठीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. ...

कोल्हापूर : एकीकडे जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि दुसरीकडे कोल्हापूर महापालिकेसाठीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. राज्यातील सत्ता नसताना आणि दोन्ही काँग्रेससह शिवसेना सत्तेत एकत्र असताना भाजपचा जिल्ह्यात कस लागणार आहे. त्यामुळे सत्ता असताना वाढलेली भाजप सूज होती की मुळातच भाजपचे पाठबळ वाढले आहे हे देखील या निमित्ताने स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने १४ नगरसेवक निवडून आणले होते. तर महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे १९ नगरसेवक निवडून आणले होते. त्यावेळी भाजप-शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असूनही अखेरपर्यंत राजेश क्षीरसागर भाजपच्या हाताला लागले नाहीत. आतातर भाजप एकाकी पडला आहे. त्यामुळे शहरात भाजपचा कस लागणार आहे. ताराराणी आघाडीची सोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर भरोसा ठेवूनच भाजपला आपली व्यूहरचना करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पाच वर्षे भाजपची सत्ता असताना प्रत्येक तालुक्यात जोडण्या घालत चंद्रकांत पाटील यांनी अनेक जणांना पक्षात आणले; परंतु राज्यातील सत्ता गेल्याने आता ही मंडळी बॅकफूटवर आल्याचे चित्र आहेत. ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी रोज काही ना काही दौरा, कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. या निवडणुकांमध्ये घाटगे यांच्यासह भाजपच्या तालुकास्तरीय नेत्यांनाही अधिक कार्यप्रवण व्हावे लागणार आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनीदेखील या निवडणुकांमध्ये लक्ष घातले आहे. दोन्ही काँग्रेसच्या तालुकास्तरीय नेत्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीची काळजी असल्याने त्यांनीही जोडण्या घातल्या आहेत. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ग्रामपंचायतीची सत्ता महत्त्वाची असल्याने त्यादृष्टीनेही नेतेमंडळी सक्रिय झाली आहेत. सत्ता नसताना चांगले यश मिळविले. आता तीन पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या हाताला काही लागू न देण्याची मोर्चेबांधणी त्यांनी केली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता भाजपला आपले नियोजन करावे लागणार आहे. निवडणुकीनंतर गरज पडलीच तर शिवसेनेचे सदस्य दोन्ही काँग्रेसबरोबर जातील. भाजपला एकाकी पाडले जाणार आहे. त्यामुळे भाजपची खऱ्या अर्थाने सत्त्वपरीक्षा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांना शिवसेनेशी जुळवून घेण्याच्या सूचना दिल्याने आता तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक लावून तुम्ही लढा, मी पाठीशी आहे असा संदेश दिला आहे. त्यामुळे पदाधिकारीही नेटाने कामाला लागण्याची चिन्हे आहेत.

चौकट

भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा संघर्ष

भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा संघर्ष गेली सहा वर्षे सुरू आहे. मात्र, सत्ता गेल्यानंतर भाजपमधील काहीजणांचे धाडस वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचमुळे थेट प्रदेशाध्यक्ष यांच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनीच त्यांचा व जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मागण्याचे धाडस केले. त्यांची संभावना फुटकळ कार्यकर्ते अशी केली असली तरी त्या मागणीची दखल प्रदेश पातळीवरही घेतली गेली आहे. प्रत्येक तालुक्यात असा नव्या-जुन्यांचा संघर्ष सुरू आहे. त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यामध्येही नेतेमंडळी कमी पडत असल्याचे चित्र आहे.

चौकट

महाडिकांना किती वाव?

कोल्हापूर महापालिकेमध्ये धनंजय महाडिक यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे द्यावीत असे भाजपमधील काहीजणांचे म्हणणे आहे. मात्र, प्रदेशाध्यक्षांच्याजवळ असणारे पदाधिकारी आणि महाडिक गटाचे सूर अजूनही म्हणावे तसे जुळलेले नाहीत. हे सूर लवकर जुळले आणि एकजिनसीपणाने पक्ष निवडणुकीला सामोरा गेला तरच चांगली संख्या गाठू शकेल.