शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विनासत्ता भाजपचा जिल्ह्यात लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST

कोल्हापूर : एकीकडे जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि दुसरीकडे कोल्हापूर महापालिकेसाठीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. ...

कोल्हापूर : एकीकडे जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि दुसरीकडे कोल्हापूर महापालिकेसाठीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. राज्यातील सत्ता नसताना आणि दोन्ही काँग्रेससह शिवसेना सत्तेत एकत्र असताना भाजपचा जिल्ह्यात कस लागणार आहे. त्यामुळे सत्ता असताना वाढलेली भाजप सूज होती की मुळातच भाजपचे पाठबळ वाढले आहे हे देखील या निमित्ताने स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने १४ नगरसेवक निवडून आणले होते. तर महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे १९ नगरसेवक निवडून आणले होते. त्यावेळी भाजप-शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असूनही अखेरपर्यंत राजेश क्षीरसागर भाजपच्या हाताला लागले नाहीत. आतातर भाजप एकाकी पडला आहे. त्यामुळे शहरात भाजपचा कस लागणार आहे. ताराराणी आघाडीची सोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर भरोसा ठेवूनच भाजपला आपली व्यूहरचना करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पाच वर्षे भाजपची सत्ता असताना प्रत्येक तालुक्यात जोडण्या घालत चंद्रकांत पाटील यांनी अनेक जणांना पक्षात आणले; परंतु राज्यातील सत्ता गेल्याने आता ही मंडळी बॅकफूटवर आल्याचे चित्र आहेत. ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी रोज काही ना काही दौरा, कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. या निवडणुकांमध्ये घाटगे यांच्यासह भाजपच्या तालुकास्तरीय नेत्यांनाही अधिक कार्यप्रवण व्हावे लागणार आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनीदेखील या निवडणुकांमध्ये लक्ष घातले आहे. दोन्ही काँग्रेसच्या तालुकास्तरीय नेत्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीची काळजी असल्याने त्यांनीही जोडण्या घातल्या आहेत. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ग्रामपंचायतीची सत्ता महत्त्वाची असल्याने त्यादृष्टीनेही नेतेमंडळी सक्रिय झाली आहेत. सत्ता नसताना चांगले यश मिळविले. आता तीन पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या हाताला काही लागू न देण्याची मोर्चेबांधणी त्यांनी केली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता भाजपला आपले नियोजन करावे लागणार आहे. निवडणुकीनंतर गरज पडलीच तर शिवसेनेचे सदस्य दोन्ही काँग्रेसबरोबर जातील. भाजपला एकाकी पाडले जाणार आहे. त्यामुळे भाजपची खऱ्या अर्थाने सत्त्वपरीक्षा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांना शिवसेनेशी जुळवून घेण्याच्या सूचना दिल्याने आता तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक लावून तुम्ही लढा, मी पाठीशी आहे असा संदेश दिला आहे. त्यामुळे पदाधिकारीही नेटाने कामाला लागण्याची चिन्हे आहेत.

चौकट

भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा संघर्ष

भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा संघर्ष गेली सहा वर्षे सुरू आहे. मात्र, सत्ता गेल्यानंतर भाजपमधील काहीजणांचे धाडस वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचमुळे थेट प्रदेशाध्यक्ष यांच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनीच त्यांचा व जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मागण्याचे धाडस केले. त्यांची संभावना फुटकळ कार्यकर्ते अशी केली असली तरी त्या मागणीची दखल प्रदेश पातळीवरही घेतली गेली आहे. प्रत्येक तालुक्यात असा नव्या-जुन्यांचा संघर्ष सुरू आहे. त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यामध्येही नेतेमंडळी कमी पडत असल्याचे चित्र आहे.

चौकट

महाडिकांना किती वाव?

कोल्हापूर महापालिकेमध्ये धनंजय महाडिक यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे द्यावीत असे भाजपमधील काहीजणांचे म्हणणे आहे. मात्र, प्रदेशाध्यक्षांच्याजवळ असणारे पदाधिकारी आणि महाडिक गटाचे सूर अजूनही म्हणावे तसे जुळलेले नाहीत. हे सूर लवकर जुळले आणि एकजिनसीपणाने पक्ष निवडणुकीला सामोरा गेला तरच चांगली संख्या गाठू शकेल.