शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आजरा तालुक्यात भाजपला मिळणार बळ

By admin | Updated: June 1, 2017 00:37 IST

अशोक चराटी यांचा प्रवेश : चंद्रकांतदादांच्या वर्षभराच्या प्रयत्नांना यश; मतांची बेरीज वाढणार

ज्योतीप्रसाद सावंत । लोकमत न्यूज नेटवर्क -आजरा : गेले वर्षभर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे अशोक चराटी यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी प्रयत्नशील होते. वर्षभरानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, चराटी यांचा समारंभपूर्वक भाजप प्रवेश होणार असून, मोजक्या कार्यकर्त्यांच्या जोरावर धावणारी भाजपची गाडी आता मात्र सुसाट धावणार असल्याने भाजपमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोकअण्णांचा परखड स्वभावाचा फटका आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह अनेकांना वेळोवेळी बसला आहे. माजी आमदार के.पी. पाटील यांना आमदारकीतून बाजूला करून प्रकाश आबिटकर यांना आमदार बनविण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. चांगल्या संस्थांचे असणारे पाठबळ, कार्यकर्त्यांची भक्कम फळी यामुळे चंद्रकांतदादा यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाकरिता प्रयत्न चालविले होते.आजरा साखर कारखाना निवडणुकीत, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी यामुळेच चराटी यांना रसद पुरविण्याचे काम भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केले होते. जि. प. निवडणुकीच्या तोंडावर चराटी यांनी भाजप प्रवेश करावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. पण, स्थानिक अडचणींमुळे त्यावेळी चराटी यांनी भाजप प्रवेश टाळला. तालुक्यातील प्रकल्प आजही अपूर्णावस्थेत आहेत. आजरा नगरपंचायतीचा प्रश्न असो की कारखान्यातील डिस्टिलरी प्रकल्पाचा प्रश्न असो, तो मार्गी लागण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या मदतीशिवाय पर्याय नाही. आजऱ्यात भाजपला अशोकअण्णांची गरज आहे, तर अशोकअण्णांना राज्य व केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे. त्यामुळेच अशोकअण्णांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे ते स्वत: मान्य करतात.अण्णा-भाऊ संस्था समूहाची व्याप्ती मोठी आहे. आजरा अर्बन बँक, आजरा सूतगिरणी, जनता शिक्षण संस्था यासह सुमारे वीस संस्थांचे या समूहातंर्गत कामकाज सुरू आहे. अशोकअण्णा स्वत: जिल्हा बँक, आजरा साखर कारखाना, राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांबरोबरच आजरा ग्रामपंचायतीचा कारभारही पाहत आहेत. अण्णा-भाऊ संस्था समूह भारतीय जनता पक्षाशी जोडला जाणे तालुका भाजपच्या पथ्यावर निश्चितच पडणार आहे.आॅक्टोबर महिन्यात तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांसह पोटनिवडणुकांचाही कार्यक्रम होणार आहे. या निवडणुकाही भाजपच्या दृष्टीने सोप्या बनणार आहेतच. पण, त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवार उभा केल्यास भाजपची मतांची बेरीज वाढणार आहे, हे निश्चित.थोडा उशीर झालाजिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर अशोकअण्णांनी भाजप प्रवेश केला असता तर जिल्हा परिषदेसह पंचायत समितीमध्ये आज वेगळे चित्र दिसले असते असे राजकीय जाणकारांतून बोलले जाते.सेना बॅकफूटवर येणारअशोकअण्णांच्या साथीने सेनेने विधानसभेसह आजरा कारखाना व इतर संस्थांमध्ये राजकीय जोडण्या घातल्या होत्या. यामुळे ठिकठिकाणी सेनेने प्रतिनिधित्वही मिळविले होते. परंतु, अशोकअण्णांच्या भाजप प्रवेशाने अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागलेली शिवसेना बॅकफूटवर येणार आहे.