शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

भाजपा आयारामांवर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 23:47 IST

दक्षिण महाराष्ट्रात चुरस : राष्ट्रवादी चोहोबाजूने अडचणीत; कॉँग्रेसला संधी

वसंत भोसले --कोल्हापूर --केंद्र आणि राज्यात सत्ताधारी झालेला भारतीय जनता पक्ष येणाऱ्या जिल्हा परिषदा तसेच तालुका पंचायतींच्या निवडणुकीसाठी आयात केलेल्या उमेदवारांवर हत्तीचे बळ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. दक्षिण महाराष्ट्रातील तिन्ही जिल्हा परिषदांमधील एकूण १९१ सदस्यांमध्ये विद्यमान सभागृहात भाजपचे केवळ चार सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते आपल्याकडे वळवून त्यांनाच भाजपचे उमेदवार बनविण्याचा खटाटोप चालू आहे. त्यामुळे मूळच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत आहे.दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा परिषद कॉँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीकडे आहे. सातारा आणि सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपचे तीन आणि साताऱ्यात एकमेव सदस्य आहे. सांगली जिल्हा परिषदेत अजूनही भाजपला खाते उघडायचे आहे. सध्या दक्षिण महाराष्ट्रातील २६ आमदारांपैकी ६ आमदार भाजपचे आहेत. चारपैकी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील भाजपचे आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रात भाजपने ७१ नगरसेवक आणि चार ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. या यशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत समित्यांमध्येही शिरकाव करण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे, पण पक्षाचे कार्यकर्ते कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसशी लढत देण्यास समर्थ नसल्याने या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यानाच प्रवेश देऊन पक्ष निवडणुकीची तयारी करीत आहे. गेले काही दिवस राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील या तिन्ही जिल्ह्यांचे दौरे करीत आहेत. त्यांच्या प्रत्येक सभा-समारंभात दोन्ही कॉँग्रेसचे दुसऱ्या अन् तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. त्यापैकी अनेकांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले जात आहे, तर काहींना त्यांच्या संस्थांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत विरोधी पक्षातील जवळपास शंभरांवर प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मित्रपक्षात अविश्वासाचे वातावरण ---शिवसेना आणि भाजपची राज्यपातळीवर युती अनिश्चित असल्याने या दोन्ही मित्र पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. शिवाय भाजपने कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत उतरविण्याची तयारी चालविल्याने शिवसेना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रचंड नाराजी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रसंगी कॉँग्रेसबरोबर स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. भाजपने युतीचे चित्र स्पष्ट नसताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ४४ जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परंपरागत विरोधकांचा भरणा असल्याने खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसमधील गटबाजी उफाळली ---भाजपने प्रथमच तडजोड करून का असेना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षासमोर आव्हान निर्माण केले आहे. सध्याचे वातावरण तसे आहे. याउलट सत्ताधारी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षामध्ये प्रचंड गटबाजी दिसत आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे कॉँग्रेसच्या आघाडीत सामील होण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक कॉँग्रेसला विरोध करण्यासाठी भाजपशी आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे सध्यातरी दक्षिण महाराष्ट्रात तिरंगी सामना रंगणार आहे; पण कालचे मित्र आजचे विरोधक अशा या सोयीस्कर आघाड्या आकाराला येत आहेत. भाजपला नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे अनेकजण या पक्षात प्रवेश करीत आहेत. शिवाय भाजपकडे जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत समित्यांसाठी स्वपक्षाचे सक्षम कार्यकर्ते म्हणून पुढे येत नाहीत, अशी या पक्षाची गोची झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादील सर्वत्र दररोज कुठा ना कुठे दणका बसत आहे. या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न कोणत्याही नेत्याकडून होताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसला संधी आहे; पण या पक्षातील वरिष्ठ नेते आपापला गट सांभाळण्यात गुंग असल्याने पुन्हा गटबाजी उफाळून येत आहे. संपूर्ण कॉँग्रेस एकजिनसी होऊन निवडणुकीची तयारी करताना दिसत नाही.