शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक, राजकीय वजनाची गल्लत म्हणजे बुद्धीची कीव, भाजपचा टोला : मागच्या दोन महिन्यांत लसीकरणात कोल्हापूर मागेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST

कोल्हापूर : भाजपने कोल्हापूर शहरातील लसीकरणाची वस्तुस्थिती मांडल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमीच्या सवयीने मूळ मुद्दा बाजूला सोडून राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करण्याचा ...

कोल्हापूर : भाजपने कोल्हापूर शहरातील लसीकरणाची वस्तुस्थिती मांडल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमीच्या सवयीने मूळ मुद्दा बाजूला सोडून राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नातून महाभकास आघाडी सरकारने कोल्हापूरवर केलेला अन्याय अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे सिद्ध होत आहे. राजकीय व शारीरिक वजन ज्यांना सारखेच वाटते त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते, असा टोला भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लगावला.

भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई व अजित ठाणेकर यांनी लसीकरणावरून सुरू असलेल्या टीकेवरून दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देणारे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात म्हटले आहे, लसीकरणाच्या विषयावर गंभीरपणे उत्तर देण्याऐवजी, पायावर पाय देण्याच्या भाषा म्हणजे उर्मटपणाच म्हणायला हवा. श्रावणबाळाची कावड वाहना-यांनी जरा मराठी वाड.मयाचाही नीट अभ्यास करावा आणि मगच पायावर पाय देण्याची भाषा करावी. आरोग्य राज्यमंत्री आजवर जिल्ह्यात झालेल्या लसीकरणामुळे जिल्हा राज्यात लसीकरण प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगत असले तरी, प्रत्यक्षात हे लसीकरण एप्रिल व मे महिन्यात झालेले आहे. त्यामुळेच कोल्हापूरचे लसीकरणाची टक्केवारी वाढल्यासारखी वाटते, परंतु प्रत्यक्षात अन्य शहरातील लसीकरणाची संख्या पाहता मे व जून महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याला लसीचा अत्यल्प पुरवठा झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे अन्य काही जिल्ह्यात व शहरात सुरू असलेले १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंद ठेवावे लागले आहे. २१ जूनला राज्यात ३ लाथ ८१ हजार लसीकरण झाले असताना त्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात फक्त ३१८४ लसी दिल्या गेल्या. ही संख्या राज्यातील लसीकरणाच्या १ टक्काही नाही. २३ जूनला महाराष्ट्रातील विक्रमी ६,०२,००० लसीकरणामध्ये कोल्हापूर शहरात केवळ ४९८ लोकांचे लसीकरण झाले होते. त्यामुळे लसीकरणाबाबत राज्य सरकार कोल्हापूरवर अन्याय करत आहे हेच खरे.