शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

‘भाजप-ताराराणी’ने चमचेगिरी थांबवावी

By admin | Updated: May 30, 2016 00:53 IST

‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ गटनेत्यांचे पत्रक : महापालिका आघाड्यांतील राजकारण शिगेला

कोल्हापूर : महानगरपालिकेचे ‘आयुक्त’पद हे शासननियुक्त पद आहे. सभागृहामध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा सभागृहाला आहे; त्यामुळे जनतेच्या विरोधातील धोरण नाकारण्याचा अधिकारही सभागृहाला आहे. असे असताना काँग्रेस-राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे कारस्थान करून आयुक्तांची चमचेगिरी करण्याचे काम भाजप-ताराराणी आघाडी करीत असल्याचा आरोप काँग्रेस आघाडीचे गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी आघाडीचे गटनेते सुनील पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. पत्रकात म्हटले की, शहराच्या विरोधात किंवा सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधात आयुक्त निर्णय घेत असतील तर त्यांना आम्हाला घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून विरोध करणारच. जर योग्य निर्णय घेणार असतील तर त्याला पाठिंबा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची भूमिका स्पष्ट आहे; पण भाजप-ताराराणी आघाडीचे पदाधिकारी सत्यजित कदम हे एप्रिल-मेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त हे स्थायी समितीत येत नाहीत, म्हणून त्यांना परत पाठवा. त्यांचा ठराव करा, मी पालकमंत्र्यांकडून तो मंजूर करून आणतो, असे वारंवार बोलत आहेत. मग हा त्यांचा एकपात्री नटरंगीपणा कशासाठी? महासभेत बोलायचे एक, स्थायी समितीमध्ये वेगळेच वागायचे आणि खासगीत अधिकारी, नगरसेवकांसमोर वेगळेच बोलायचे; नंतर भाजप-ताराराणी आघाडीच्या नावाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीला नावे ठेवून वेगळेच पत्रक काढायचे, अशी त्यांची नीती आहे. आयुक्तांच्या बाबतीत ठराव करायचा झाला तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पक्षांच्या सर्व नगरसेवकांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊन रीतसर प्रक्रिया करता येईल. आता लवकरच महासभा नसल्याने भाजप-ताराराणी आघाडीचा कांगावा हा फक्त आयुक्तांच्या चमचेगिरीसाठीच आहे. आयुक्तांची लाचारी करण्यासाठी शासनाकडून प्रलंबित अनुदान मिळवा व शहरविकासात ‘अच्छे दिन’ आणा, असाही टोला पत्रकाद्वारे मारला आहे. (प्रतिनिधी)