शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

भ्रष्टाचार दडपण्यासाठीच भाजपचा आधार

By admin | Updated: April 21, 2017 00:09 IST

पी. एन. पाटील : ‘सह्याद्री’साठी ‘भोगावती’ मोडण्यास निघालेल्यांना इचलकरंजीचा रस्ता दाखवा

सडोली खालसा : गेल्या सहा वर्षांत ‘भोगावती’मध्ये केलेला भ्रष्टाचार दडपण्यासाठीच राष्ट्रवादीच्या मंडळींनी भाजपला जवळ केल्याचा आरोप कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केला. ‘सह्याद्री’ उभारण्यासाठी ‘भोगावती’ मोडण्यासाठी आलेल्यांना इचलकरंजीचा रस्ता दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचारार्थ आरे, गाडेगोंडवाडी, कारभारवाडी येथील प्रचारदौऱ्यात ते बोलत होते. करवीर व राधानगरी तालुक्यांतील शेतकऱ्यांची ‘भोगावती’ ही दौलत आहे. तिची जपणूक करण्यासाठी ‘शाहू आघाडी’ला साथ द्या, असे आवाहन करीत पी. एन. पाटील म्हणाले, विरोधकांनी कारखान्यात भ्रष्टाचाराचा कळस केला आहे. कलम ८३ नुसार चौकशी झाली तर ही मंडळी सापडणार आहेत, या भीतीपोटीच सत्तेतील भाजपला जवळ केले आहे. पण आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, भ्रष्टाचाराची पैन्पै राष्ट्रवादीच्या मंडळींकडून वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. संजयसिंह पाटील म्हणाले, सहा वर्षांमध्ये ‘भोगावती’मध्ये भ्रष्ट कारभार बोकाळला. त्याचा उद्रेक म्हणून कधी नव्हे ते यावेळी कामगार संघटनेत व गावागावांतील ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांमध्ये उठाव झाला असून, ‘शाहू’ आघाडीचा विजय निश्चित आहे. मोलॅसिस, साखर, बगॅस विक्रीमध्ये तसेच अवास्तव दराने केलेली खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केला आहे. विरोधकांनी १ लाख ४२ हजार टन मोलॅसिस विकले. या मोलॅसिसच्या विक्रीत तर त्यांनी टनामागे ७०० ते १००० रुपयांपर्यंतचा ढपला पाडला. ऊसतोडणीत बगलबच्च्यांचा ऊस आणल्याचा आरोप पाटील यांनी केला. कृष्णराव पाटील, अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे, उदयसिंंह पाटील, राहुल पाटील, सरदार वरुटे, जयदीप मोहिते, संतोष पोर्लेकर, बबन रानगे, संदीप पाटील, बी. ए. पाटील, आदी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)