शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

भाजप नव्याने टोल लादतंय : अजित पवार

By admin | Updated: February 2, 2015 23:41 IST

केवळ लेटरपॅडसाठी शाखा न उघडता प्रत्यक्षात काम करावे. अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने जोमाला लागावे. केंद्र सरकारने अनेक पॅकेजची घोषणा केली.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्यावेळी टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन देत भाजप सत्तेवर आले. मात्र, तेच आता जनतेची दिशाभूल करत नव्याने टोल लादत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.शहर, जिल्हा राष्ट्रवादीतर्फे येथील शाहू सांस्कृतिक मंदिरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज, सोमवारी ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले, भाजपची भूमिका दुटप्पी आहे. कोल्हापूरच्या टोलप्रश्नी समिती नेमून चोथा केला आहे. समितीच्या पुढे काहीही निर्णय होत नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देणार, असे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. भाजप आणि शिवसेना जातीयवादी पक्ष आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ेकार्यकर्त्यांनी सतर्कपणे पक्षबांधणीसाठी योगदान द्यावे. शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे. केवळ लेटरपॅडसाठी शाखा न उघडता प्रत्यक्षात काम करावे. अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने जोमाला लागावे. केंद्र सरकारने अनेक पॅकेजची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात अद्याप पैसे मिळालेले नाहीत.खासदार धनंजय महाडिक हे सर्व घटकांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. महाडिक यांनी केवळ शहरापुरतेच न राहता सर्व तालुक्यांत पक्षसंघटना मजबूत करावी. शिधापत्रिकेवरील रेशन बंद केल्याच्या विरोधात ३ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्णातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार आहे. नाव न घेता शेट्टींवर टीकास्त्र.बारामती, कराड, इंदापूर येथे जाऊन आंदोलन करणारे खासदार आता ‘बघ्याची भूमिका’ घेत आहेत, असा नामोल्लेख टाळत खासदार राजू शेट्टी यांच्यावर पवार यांनी टीकास्र सोडले. एफआरपी न देणाऱ्यांवर कारवाईची धमकी देण्याशिवाय काहीही झालेले नाही. भाजपच्याही नेत्यांचे कारखाने आहेत. त्या कारखान्यांनीही एफआरपीची रक्कम अजून दिलेली नाही. कारवाईचा इशारा देऊन काहीही होत नाही, असे पवार म्हणाले.