शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार शेतकरीविरोधी- सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:23 IST

सावरवाडी : केंद्रातील मोदी सरकार केवळ घोषणाबाजी करून भूलथापा मारून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा कुटील डाव करीत आहे.

ठळक मुद्दे शिरोली दुमाला येथे कार्यक्रम, केवळ घोषणाबाजी करून भूलथापा नव्या परिवर्तनाची ग्रामीण भागात कॉँग्रेस पक्षाची नव्या उभारणी करण्यासाठी युवा शक्तीची खरी गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसावरवाडी : केंद्रातील मोदी सरकार केवळ घोषणाबाजी करून भूलथापा मारून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा कुटील डाव करीत आहे. नोटाबंदी, काळा पैसा व शेतकºयांची कर्जमाफी यामुळे सामान्य जनता हैराण झाली असून, शेतकºयांच्या विकासाऐवजी शेतकरीविरोधी धोरणे राबविणारे केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरीविरोधी असल्याची टीका कॉँग्रेस पक्षाचे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केली.

शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील कै. शिवाजीराव कृष्णा पाटील युवक मंडळ व तुळशी सहकार समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाटील होते.पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात मी गेली २५ वर्षे कार्यरत आहे. कार्यकर्त्यांच्या पाठबळाबरोबरच युवाशक्तीला जनताभिमुख विचारांची शिकवण देणे गरजेचे असल्याचे सांगून आ. सतेज पाटील आपल्या भाषणात म्हणाले, भाजप सरकारच्या राजवटीत शेतकरी, युवक, सुशिक्षित युवकांना विकासापासून वंचित ठेवले जाते. बेरोजगाराचे प्रश्न वाढत आहेत.

नोकºया मिळत नाही, गेल्या तीनवर्षांत केवळ खोटी आश्वासनेदिली. शेतकºयांचा सातबारा बदलला. जवानांची हत्या होत आहे. याबाबत केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांचे प्रश्न वाढताहेत. नव्या परिवर्तनाची ग्रामीण भागात कॉँग्रेस पक्षाची नव्या उभारणी करण्यासाठी युवा शक्तीची खरी गरज आहे.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक बाबासाहेब चौगले,करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

युवा कॉँग्रेसचे चेतन पाटील, यशवंत बॅँकेचे संचालकसरदार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, मनोहर भोपळे, सर्जेराव पाटील,डी. वाय. पाटील, धुळोबा पाटील, संजय कदम, संदीप पवार, राम सारंग,नितीन पाटील, राजू शिरगांवकर, पांडुरंग पाटील, राऊ पाटील (वाकरेकर), आदी उपस्थित होते. प्रारंभी उपसरपंच सरदार पाटील यांनी प्रास्ताविक केले. मयूर घोरपडे यांनी आभार मानले.