शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

भाजप सरकार शेतकरीविरोधी

By admin | Updated: March 5, 2016 00:02 IST

धान पिकांचे ३३ टक्के नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल, असे राज्य शासनाने घोषित केले होते.

साकोलीत धरणे आंदोलनात राकाँचा आरोप : दुष्काळनिधी शेतकऱ्यांना द्यासाकोली : धान पिकांचे ३३ टक्के नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल, असे राज्य शासनाने घोषित केले होते. पंरतु भंडारा जिल्ह्यात ६० ते ६२ पैसेवारी जाहीर केल्यामुळे ही गावे ३३ टक्के निकषात बसत असूनही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यातील रद्द झालेली दुष्काळग्रस्त निधी शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे साकोली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवदेनानुसार, खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे साकोली लाखनी व लाखांदूर तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले होते. धानाचे उत्पादनही कमी झाले. त्यानंतर राज्य शासनाने बाधीत शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटी रूपये वाटप करणार असल्याचे सांगितले होते. राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त गावापैकी भंडारा जिल्ह्यातील ३७१ गावे पैसेवारीत दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. या गावातील शेतकऱ्यांना शासन निर्देशानुसार दिलासा मिळेल, अशी आशा होती. असे असताना खरीप हंगामात अवर्षणामुळे बाधीत शेतकऱ्यांना नववर्षाच्या प्रारंभी शासनाने घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त निधीतून भंडारा जिल्ह्याला वगळण्यात आले होते. परिणामी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेल्या ३७१ गावातील शेतकरी मदतीविना राहणार आहेत.शासकीय मदतीच्या आशेवर कर्ज फेडून शेती कसण्यााची भाबडी आशा बाळगणारे शेतकरी हवालदिल झाले आहे. कर्जात असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सुलतानी संकटाला बळी पडावे लागणार आहे. हे टाळण्यासाठी शासनाने जाहीर केलेला निधी शेतकऱ्यांना देण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली. २९ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तालुक्यातील शेतातील धान, गहु व रबी पिकचे व विट भट्ट्याचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, दामाजी खंडाईत, अविनाश ब्राम्हणकर, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, हेमकृष्ण वाडीभस्मे, नरेंद्र वाडीभस्मे, सदाशिव वलथरे, अंगराज समरीत, दीपक चिरवतकर, बालु चुन्ने, धनु व्यास, उर्मिला आगाशे, कैलास गेडाम, आशा हटवार, लता दुरूगकर, शिलादेवी वासनिक, उमेद गोडसे, राकेश भास्कर, शैलेश गजभिये यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)