शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाजप-काँग्रेसकडून प्रमाणपत्राची गरज नाही_ असादुद्दीन ओवैसी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:57 IST

बेळगाव : काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचे, तर भाजप राष्ट्रीयत्वाचे दुकान चालवित असून त्यांच्याकडून आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीका बेळगावात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी केल.

ठळक मुद्देजेडीएसला मतदान करण्याचे आवाहन

बेळगाव : काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचे, तर भाजप राष्ट्रीयत्वाचे दुकान चालवित असून त्यांच्याकडून आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीका बेळगावात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी केल.काँग्रेस-भाजपला विसरा आणि जेडीएसला मत द्या, असा नारा त्यांनी दिला. बेळगावात भगवा फेटा परिधान करून त्यांनी भाषण दिले. सीपीएड् मैदान येथे सभा झाली.

बेळगाव उत्तरमधील उमेदवार अशफाक मडकी, शिवनगौडा पाटील या जनता दल (स.) उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आले होते. मी अनेक दिवसांपासून बेळगावला यायचा विचार करीत होतो; पण कर्नाटकातील काँग्रेस सरकार आडकाटी घालण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे हे शक्य होत नव्हते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मला बेळगावला येण्यापासून कायम रोखत होते; पण मी आता बेळगावला येतच राहणार. मला आता रोखणे काँग्रेसला शक्य होणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले.

राहुल गांधी म्हणत होते, संसदेत १५ मिनिटे बोलायला संधी द्या. आता त्याच राहुल गांधींना मी विचारतो की, मला बेळगावला येण्यास का रोखत होता. मोदी आणि राहुल गांधी यांनी माझ्याबरोबर खुल्या चर्चेला यावे. फक्त पाच मिनिटे चर्चा करा, असे खुले आव्हान मी देतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले. ओवैसी कर्नाटकात मत विभाजन करायला आले आहेत, असे लोक म्हणत आहेत. मुस्लिम, दलित सर्वसामान्य वर्गाच्या राजकीय सबलीकरणासाठी काँग्रेस, भाजप बाधा घालत आहेत.

मी कोणत्याही जाती-धर्माच्या बाजूने नाही. माझे आंदोलन प्रत्येकाला घटनेने दिलेले अधिकार मिळावेत यासाठी आहे. कर्नाटकात दिवसेंदिवस गुन्हे आणि संशयास्पद मृत्यू वाढताहेत. काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढली आहे. मोदींना गुजरातला परत पाठविण्याचे धाडस फक्त प्रादेशिक पक्षातच आहे.आझाद यांचा ओवैसींवर पलटवारबेळगाव : असादुद्दीन ओवैेसी हे कोणत्या दुकानदारातून जन्माला आले आहेत, असा प्रश्न उपस्थित करून ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाबनबी आझाद यांनी ओवैेसी यांच्यावर पलटवार केला आहे. मंगळवारी सायंकाळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप राष्ट्रीयत्वाचे तर काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेची दुकानदारी चालविली असल्याची टीका ओवैेसी यांनी केली होती. निवडणुकीत दिलेली कोणतीच आश्वासने मोदी सरकारने पाळली नाहीत. संसदेत विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी बाहेर काँग्रेस विरोधी वक्तव्ये करीत आहेत. असे ते म्हणाले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८