शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

सा. रे. पाटील यांचे पुन्हा एकतर्फी वर्चस्व

By admin | Updated: July 22, 2014 23:59 IST

दत्त कारखाना निवडणूक : विधानसभेला राजकीय गणित बदलणार

संदीप बावचे- शिरोळगेल्या बेचाळीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने सत्ताधारी गटाचे प्रमुख आ. सा. रे. पाटील यांनी ‘दत्त’वरील आपले पुन्हा एकदा एकतर्फी वर्चस्व सिद्ध करून दाखविले आहे. बिनविरोधचा हा निकाल तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. ऊसदराच्या प्रश्नावरून आंदोलन म्हटले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना आलीच. ‘दत्त’च्या या आंदोलन केंद्रातून खा. राजू शेट्टी यांची कारकीर्द सुरू झाली होती. या चळवळीतून खा. शेट्टी लोकसभेत पोहोचले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निकालानंतर श्री दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीत खा. शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल उभे राहील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, मल्टिस्टेट कायद्यातील जाचक अटींमध्ये कारखान्याने मनमानी नियम केल्याचा आरोप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘दत्त’च्या या रणांगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे ‘स्वाभिमानी’चे नेतृत्व मानणाऱ्या शेतकरी सभासदांत संभ्रमावस्था निर्माण झाली. या निवडणुकीत स्वाभिमानीकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ‘दत्त’ची ही निवडणूक बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झाले. वास्तविक मल्टिस्टेट कायद्याच्या अनुषंगाने सर्व बाबींची पूर्तता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने करणे गरजेचे होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दत्त उद्योग समूहाचे प्रमुख आ. सा. रे. पाटील यांनी राजकारणातील डावपेच खेळून आपली ४० वर्षांतील ‘दत्त’वरील पकड कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. वयाच्या ९४व्या वर्षी देखील त्यांची काम करण्याची पद्धत निश्चित वाखाणण्यासारखी आहे. राजकारणापेक्षा सामाजिक विकास, वैचारिक परिवर्तन व उत्कृष्ठ प्रशासनाची सांगड घालून ‘दत्त’ उद्योग समूहात केलेली लक्षणीय प्रगती याची प्रचितीच या निकालातून स्पष्ट झाली आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ‘दत्त’चा हा निकाल राजकीय गणित मांडणारा ठरणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीत सा. रे. पाटील यांनी मिळविलेल्या यशामुळे सध्या ‘फिलगूड’चे वातावरण तयार झाले आहे.