शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

सा. रे. पाटील यांचे पुन्हा एकतर्फी वर्चस्व

By admin | Updated: July 22, 2014 23:59 IST

दत्त कारखाना निवडणूक : विधानसभेला राजकीय गणित बदलणार

संदीप बावचे- शिरोळगेल्या बेचाळीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने सत्ताधारी गटाचे प्रमुख आ. सा. रे. पाटील यांनी ‘दत्त’वरील आपले पुन्हा एकदा एकतर्फी वर्चस्व सिद्ध करून दाखविले आहे. बिनविरोधचा हा निकाल तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. ऊसदराच्या प्रश्नावरून आंदोलन म्हटले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना आलीच. ‘दत्त’च्या या आंदोलन केंद्रातून खा. राजू शेट्टी यांची कारकीर्द सुरू झाली होती. या चळवळीतून खा. शेट्टी लोकसभेत पोहोचले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निकालानंतर श्री दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीत खा. शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल उभे राहील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, मल्टिस्टेट कायद्यातील जाचक अटींमध्ये कारखान्याने मनमानी नियम केल्याचा आरोप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘दत्त’च्या या रणांगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे ‘स्वाभिमानी’चे नेतृत्व मानणाऱ्या शेतकरी सभासदांत संभ्रमावस्था निर्माण झाली. या निवडणुकीत स्वाभिमानीकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ‘दत्त’ची ही निवडणूक बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झाले. वास्तविक मल्टिस्टेट कायद्याच्या अनुषंगाने सर्व बाबींची पूर्तता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने करणे गरजेचे होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दत्त उद्योग समूहाचे प्रमुख आ. सा. रे. पाटील यांनी राजकारणातील डावपेच खेळून आपली ४० वर्षांतील ‘दत्त’वरील पकड कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. वयाच्या ९४व्या वर्षी देखील त्यांची काम करण्याची पद्धत निश्चित वाखाणण्यासारखी आहे. राजकारणापेक्षा सामाजिक विकास, वैचारिक परिवर्तन व उत्कृष्ठ प्रशासनाची सांगड घालून ‘दत्त’ उद्योग समूहात केलेली लक्षणीय प्रगती याची प्रचितीच या निकालातून स्पष्ट झाली आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ‘दत्त’चा हा निकाल राजकीय गणित मांडणारा ठरणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीत सा. रे. पाटील यांनी मिळविलेल्या यशामुळे सध्या ‘फिलगूड’चे वातावरण तयार झाले आहे.