शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

पश्चिम घाटातील जैवविविधता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:59 IST

संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : खाणकाम व प्रदूषणामुळे पश्चिम घाटातील शुद्ध पाण्याच्या स्रोतांवर आधारित परिसंस्था व अनेक प्रकारच्या सजीवांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र हे जैवविविधतेने अतिसंपन्न क्षेत्र आहे. तेथे विकासकामांचे नियोजन करताना शुद्ध पाण्याच्या स्रोतांचा व वन्य प्रजातींच्या रक्षणाचा विचार होणे गरजेचे आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिकार, ...

संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : खाणकाम व प्रदूषणामुळे पश्चिम घाटातील शुद्ध पाण्याच्या स्रोतांवर आधारित परिसंस्था व अनेक प्रकारच्या सजीवांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र हे जैवविविधतेने अतिसंपन्न क्षेत्र आहे. तेथे विकासकामांचे नियोजन करताना शुद्ध पाण्याच्या स्रोतांचा व वन्य प्रजातींच्या रक्षणाचा विचार होणे गरजेचे आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिकार, राखीव वनक्षेत्रे आणि वन्यजिवांबाबत अनेक कायदे तसेच अधिसूचना केल्याचे इतिहासात डोकावताना आढळते. त्यांची प्रेरणा घेऊन जरी आपण आज काही नियम पाळले तरी जैवविविधता टिकण्यास मदत होईल. पश्चिम घाटातील वन्यजिवांचे संवर्धन व्हायचे असेल तर जंगलांचे, सड्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यामुळे या परिसरातून उगम पावणाऱ्या नद्या आणि पाण्याचे स्रोत यांचे संवर्धन होईल.अनेक संरक्षित ठिकाणे ही शुद्ध पाण्याच्या स्रोतांजवळ असली तरी तेथील जैवविविधता धोक्यात आली आहे. कृषी व औद्योगिक प्रदूषणामुळे अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. निवासी व व्यावसायिक विकास, धरणे व ऊर्जानिर्मिती, खाणकाम यांमुळे शुद्ध पाण्याच्या स्रोतांमधील प्रजातींवर परिणाम झाला आहे.पश्चिम घाटात पर्वतीय परिसरात ५० टक्के जंगले नष्ट झाली आहेत व नंतर तिथे अतिक्रमणे व जंगलतोड सुरूच राहिली. पश्चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यांमध्ये जवळजवळ ३२५ प्रजाती जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या आहेत. तसेच उभयचरांमधील बºयाच प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. ही रांग वन्य जिवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे.निलगिरीच्या जंगल क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थाने आहेत. कर्नाटकातील पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती आढळतात व भारतात सापडणाºया वाघांपैकी १0 टक्के वाघसुद्धा इथेच आहेत. अजगराच्या काही जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. तसेच अनेक विषारी व बिनविषारी प्रकारचे सरपटणारे प्राणीही येथेच आढळतात. या सर्वांचे संवर्धन व्हायचे असेल तर जैवविविधता वाचवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.