शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

बाईक स्टाईलची धूम आता धोकादायक वळणार

By admin | Updated: February 5, 2016 23:59 IST

तरुणाईचा अतिउत्साह : महाविद्यालय, पोलीस आणि नंतर पालक यांनी ‘ब्रेक’ लावण्याची गरज

आयुब मुल्ला -- खोची  महाविद्यालयीन तरुणाईच्या मैत्रीला, प्रेमाला अनेक कंगोरे धारण होत चाललेले आहेत. फॅशनच्या दुनियेत बाईकची स्टाइल धूम ठोकू लागली आहे. मुलगा-मुलगी तोंडावर स्कार्प बांधून रस्त्यांवरून नुसत्या गतीने नाही तर अतिवेगाने सुसाट धावताना दिसतात. हा वेग कामाच्या गडबडीत वेळेत पोहोचले पाहिजे यासाठी नसतो तर तो ईर्ष्येच्या स्टाईलचा असतो. यातूनच घात- अपघाताचे वाढते चित्र पहावयास मिळत आहे.महाविद्यालय, पोलीस आणि नंतर पालक यांनी पायबंद घातलाच पाहिजे. नाही तर तरुणाईची धूम स्टाईल आणखीन गती घेईल अन् पालकांना त्याचा पश्चात्ताप सहन करावा लागेल.सध्या अशा स्टाईलची चलती जादा आहे. कारण हा कालावधी टॅ्रडिशनल डे, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या रेलचेलीचा आहे. जादा अभ्यास नाही, परीक्षा तोंडावर नाहीत. त्यामुळे वर्षातील हा कालावधी जल्लोषाचा असल्याचे महाविद्यालय परिसरात जाणवते. वास्तविक तरुणाईच्या कलागुणांना संधी देणे म्हणजे गॅदरिंग होय. त्यांच्या दृष्टीने ही एक पर्वणीच असते.सकाळपासून सायंकाळपर्यंत कार्यक्रमाच्या रुपरेषेपासून तो पार पडेपर्यंत अमाप उत्साह तरुणार्इंच्यात वावरत असतो; परंतु त्याचा लूकच बदलत चालला आहे. प्रामाणिकपणे आनंद साजरा करतो येतो; परंतु अतिउत्साही हाताच्या बोटांवर मोजण्याइतके विद्यार्थी मात्र गैरवर्तनाच्या मार्गाचा अवलंब करतात.पॉकेटमनी जास्त असतो. घरचेही अशा काळात फारसे लक्ष देत नाहीत. नेमक्या याच बाबींचा फायदा मैत्रीच्या, प्रेमाच्या नावाखाली लुटला तर जात नाही ना असे प्रश्न जाणकार व्यक्त करतात. आधुनिक तंत्रज्ञाने बनलेल्या बाईक, ती चालवणारा युवक, पाठीमागे बसलेली मैत्रीण, दोघांच्याही तोंडावर स्कार्प त्यामुळे आम्हाला कोण ओळखू शकत नाही, अशा गैरसमजुतीतून ते रस्त्यावरून सुसाट असतात.स्टँड, हॉटेल, गार्डन, क्रीडांगण या ठिकाणीसुद्धा एकत्रितपणे अशी जोडपी आढळतात. ग्रामीण भागांतून शहरात आलेल्या व्यक्तींना हे चित्र पहायला मिळाल्यानंतर त्यांच्यात प्रश्नांची अंतर्गत सरबत्ती झाल्याशिवाय राहत नाही. मुळात शिक्षणाला महत्त्व देण्याचे प्रमाण सगळीकडेच वाढले आहे. तो निर्णयही स्वागतार्ह आहे; परंतु त्यातून चांगले परिणाम दिसले पाहिजेत. परीक्षा, क्रीडा प्रकारात बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनी उत्तम कामगिरी करीत आहेत. त्यांना सगळेजण शाबासकी देतात, पण काहीजण मैत्री, प्रेम सारखे बदलत आहेत. हे ते सर्व प्रसिद्धीसाठी खटाटोप करीत आहेत. ते थांबविण्यासाठी समाजातील जबाबदार घटकांनी पुढे आले पाहिजे. शाळा, कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये आकर्षण असते; परंतु ते क्षणिक असते. क्षणिक आकर्षणामुळे ते काही काळासाठी एकत्र येतात. त्यातून बहुतांश प्रमाणात अडथळेच निर्माण होतात. अखेर त्यांच्यामध्ये जी समस्या निर्माण होते, तिचे सामाजिक समस्येत रूपांतर होते. यासाठी आम्ही प्रबोधनाचे काम शाळा, महाविद्यालयात जाऊन करीत आहोत, असे जाधव म्हणाले.दुचाकीवरून टिंगळटवाळी करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी सुरू आहे. संशयास्पदरीत्या फिरणाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे. संरक्षणाची जबाबदारी सर्वच पद्धतीने हाताळली जात आहे.- धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक, पेठवडगाव