शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

बिहारमध्ये जनतेच्या विश्वासघाताचे पडसाद

By admin | Updated: November 8, 2015 23:38 IST

पतंगराव कदम : आटपाडीत दुष्काळाचा आढावा

खरसुंडी : बिहार राज्याचा निकाल हा मोदी सरकारने देशातील जनतेला दिलेल्या खोट्या अश्वासनांचा आणि जनतेच्या विश्वासघाताचा परिणाम असल्याचे मत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी खरसुंडी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केले. आटपाडी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी त्यांनी केली. नेलकरंजी येथील सभागृहाचे व खरसुंडी येथील विश्रामगृहाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, जनेतचा मतप्रवाह बदलत असून, भविष्यात कॉँग्रेसप्रणित सरकार देशात व राज्यात येणार आहे. तरी कार्यक र्त्यांनी मरगळ झटकून जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र लढा देऊन रस्त्यावर उतरावे. आपण पालकमंत्री असताना जनतेसाठी व जिल्ह्यातील विकासासाठी निधी कधी कमी पडू दिला नाही. म्हैसाळ, टेंभू व ताकारी योजना पूर्ण करून शेतीच्या पाण्यासाठी टंचाई निधीतून निधी उपलब्ध करून दिला. सध्याचे युती सरकार निधीसाठी टाळाटाळ करत असून, शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढवला जात असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी मोहनकाका भोसलेंसारख्या नेत्यांची उणीव भासत आहे. त्यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने तालुक्यातील तलाव बांधण्यासाठी १५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील अनेक तलाव, बंधारे बांधले गेल्याने शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. त्यांचाच वारसा जयदीप भोसले चालवत असल्याने जनतेने त्यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही कदम यानी यावेळी केले. प्रास्ताविक शशिकांत देठे यांनी केले. यावेळी युवक कॉँग्रेसचे राजू मोरे, प्रदीप पाटील, राहुल गायकवाड, विजय पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेत्या रुक्मिणीताई यमगर, पार्वती पुजारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)राज्यातील दुष्काळाबाबत राज्य सरकार उदासीन आघाडी सरकारच्या कालावधित दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनांबाबत स्थायी आदेश शासनाने काढले होते. बजेटची चिंता न करता उपाय योजनांवर आणि मदतीसाठी पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च केला. सध्याचे सरकार दुष्काळाबाबतीत म्हणावे तितके गंभीर दिसत नाही, असे कदम यावेळी म्हणाले.