शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये जनतेच्या विश्वासघाताचे पडसाद

By admin | Updated: November 8, 2015 23:38 IST

पतंगराव कदम : आटपाडीत दुष्काळाचा आढावा

खरसुंडी : बिहार राज्याचा निकाल हा मोदी सरकारने देशातील जनतेला दिलेल्या खोट्या अश्वासनांचा आणि जनतेच्या विश्वासघाताचा परिणाम असल्याचे मत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी खरसुंडी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केले. आटपाडी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी त्यांनी केली. नेलकरंजी येथील सभागृहाचे व खरसुंडी येथील विश्रामगृहाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, जनेतचा मतप्रवाह बदलत असून, भविष्यात कॉँग्रेसप्रणित सरकार देशात व राज्यात येणार आहे. तरी कार्यक र्त्यांनी मरगळ झटकून जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र लढा देऊन रस्त्यावर उतरावे. आपण पालकमंत्री असताना जनतेसाठी व जिल्ह्यातील विकासासाठी निधी कधी कमी पडू दिला नाही. म्हैसाळ, टेंभू व ताकारी योजना पूर्ण करून शेतीच्या पाण्यासाठी टंचाई निधीतून निधी उपलब्ध करून दिला. सध्याचे युती सरकार निधीसाठी टाळाटाळ करत असून, शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढवला जात असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी मोहनकाका भोसलेंसारख्या नेत्यांची उणीव भासत आहे. त्यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने तालुक्यातील तलाव बांधण्यासाठी १५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील अनेक तलाव, बंधारे बांधले गेल्याने शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. त्यांचाच वारसा जयदीप भोसले चालवत असल्याने जनतेने त्यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही कदम यानी यावेळी केले. प्रास्ताविक शशिकांत देठे यांनी केले. यावेळी युवक कॉँग्रेसचे राजू मोरे, प्रदीप पाटील, राहुल गायकवाड, विजय पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेत्या रुक्मिणीताई यमगर, पार्वती पुजारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)राज्यातील दुष्काळाबाबत राज्य सरकार उदासीन आघाडी सरकारच्या कालावधित दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनांबाबत स्थायी आदेश शासनाने काढले होते. बजेटची चिंता न करता उपाय योजनांवर आणि मदतीसाठी पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च केला. सध्याचे सरकार दुष्काळाबाबतीत म्हणावे तितके गंभीर दिसत नाही, असे कदम यावेळी म्हणाले.