शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये जनतेच्या विश्वासघाताचे पडसाद

By admin | Updated: November 8, 2015 23:38 IST

पतंगराव कदम : आटपाडीत दुष्काळाचा आढावा

खरसुंडी : बिहार राज्याचा निकाल हा मोदी सरकारने देशातील जनतेला दिलेल्या खोट्या अश्वासनांचा आणि जनतेच्या विश्वासघाताचा परिणाम असल्याचे मत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी खरसुंडी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केले. आटपाडी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी त्यांनी केली. नेलकरंजी येथील सभागृहाचे व खरसुंडी येथील विश्रामगृहाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, जनेतचा मतप्रवाह बदलत असून, भविष्यात कॉँग्रेसप्रणित सरकार देशात व राज्यात येणार आहे. तरी कार्यक र्त्यांनी मरगळ झटकून जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र लढा देऊन रस्त्यावर उतरावे. आपण पालकमंत्री असताना जनतेसाठी व जिल्ह्यातील विकासासाठी निधी कधी कमी पडू दिला नाही. म्हैसाळ, टेंभू व ताकारी योजना पूर्ण करून शेतीच्या पाण्यासाठी टंचाई निधीतून निधी उपलब्ध करून दिला. सध्याचे युती सरकार निधीसाठी टाळाटाळ करत असून, शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढवला जात असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी मोहनकाका भोसलेंसारख्या नेत्यांची उणीव भासत आहे. त्यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने तालुक्यातील तलाव बांधण्यासाठी १५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील अनेक तलाव, बंधारे बांधले गेल्याने शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. त्यांचाच वारसा जयदीप भोसले चालवत असल्याने जनतेने त्यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही कदम यानी यावेळी केले. प्रास्ताविक शशिकांत देठे यांनी केले. यावेळी युवक कॉँग्रेसचे राजू मोरे, प्रदीप पाटील, राहुल गायकवाड, विजय पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेत्या रुक्मिणीताई यमगर, पार्वती पुजारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)राज्यातील दुष्काळाबाबत राज्य सरकार उदासीन आघाडी सरकारच्या कालावधित दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनांबाबत स्थायी आदेश शासनाने काढले होते. बजेटची चिंता न करता उपाय योजनांवर आणि मदतीसाठी पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च केला. सध्याचे सरकार दुष्काळाबाबतीत म्हणावे तितके गंभीर दिसत नाही, असे कदम यावेळी म्हणाले.