शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

बिद्री मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST

सरवडे : बिद्री साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत मिसळल्याने नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काठावरील ...

सरवडे : बिद्री साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत मिसळल्याने नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काठावरील शेकडो गावांतील हजारो नागरिक आजारी पडत असून मृत माशांचा खच व पाण्याला सुटलेल्या दुर्गंधीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्याने नदीत मिसळणारे दूषित पाणी रोखावे अन्यथा कारखान्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याचा इशारा बिद्रीच्या नदीकाठावरील लोकप्रतिनिधींनी निवेदनाद्वारे दिला.

याबाबत माहिती अशी : गेल्या १५ दिवसांपासून दररोज रात्री दहाच्या दरम्यान दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाणी दूधगंगा नदीत सोडण्यात येते. मळी नदीत मिसळल्याने नदीकाठावरील जवळजवळ पन्नास ते साठ गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काठावरील शेकडो गावांतील हजारो नागरिक गॕॅस्ट्रोने आजारी पडले आहेत. नदीत मृत माशांचा खच व पाण्याला सुटलेल्या दुर्गंधीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिद्री,वाळवे खुर्द, कसबा वाळवा, कासारवाडा, चंद्रे, चांदेकरवाडी, पालकरवाडी, सोनाळी, चांदेकरवाडी, बेळवळे खुर्द, बेलवळे बु. केबळी, बाचणी, पालकरवाडी, आदी प्रमुख गावांतील शेकडो नागरिक यामुळे आजारी पडले आहेत.

कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या टेबलावर बादलीत दूषित पाणी ओतून कारखाना प्रशासनाचा प्रतीकात्मक निषेध केला. कारखान्याने याबाबत त्वरित उपाययोजना केली नाही तर कारखान्याच्या संचालकांना दूषित पाणी पाजू व कारखान्यावर फौजदारी करू. यावेळी कार्यकारी संचालक आर. डी. देसाई म्हणाले, नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याबाबत माहिती घेऊन योग्य उपाययोजना केली जाईल.

शिष्टमंडळात बाळासाहेब पाटील, अशोक पाटील, भास्कर खोत, प्रवीण खोत, उपसरपंच, पंचायत समितीचे सदस्य जयदीप पोवार, स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, उत्तम पाटील, उपसरपंच बाचणी, गोरख पाटील, सुदर्शन पाटील, शंकर पाटील- बेलवळे बु., बंडोपंत पाटील, सदाशिव मांडवकर, राजाराम सिरसट, नामदेव फराकटे, सचिन आबदार, सरपंच भाऊ पालकर उपस्थित होते.

...... फोटो : बिद्री साखर कारखान्याच्या प्रशासनाला निवेदन देताना नामदेव चौगले, अशोक फराकटे, बाळासाहेब पाटील व इतर उपस्थित होते.