शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
4
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
5
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

‘बिद्री’त दादा, मुश्रीफ, के. पी. यांची गट्टी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात ‘गट्टी’ जमल्याचे समजते. गुरुवारी सकाळी त्यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थानी बोलणी झाली आहेत. यावेळी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर व राहुल देसाई हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे जिल्ह्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात ‘गट्टी’ जमल्याचे समजते. गुरुवारी सकाळी त्यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थानी बोलणी झाली आहेत. यावेळी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर व राहुल देसाई हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात ‘भाजप-राष्ट्रवादी युती’चा नवा पॅटर्न आकार घेऊ लागला आहे.बिद्री साखर कारखान्यात आता गेली दीड वर्षे प्रशासक मंडळ अस्तित्वात आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्याने तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच हे मंडळ नियुक्त केले आहे. त्यांनी हा कारखाना उत्तम पद्धतीने चालविला आहे. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेच कारभार असू दे, अशाही भावना सभासदांतून मध्यंतरी व्यक्त झाल्या; परंतु आता कारखान्यास निवडणुकीचे वेध लागले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. के. पी. पाटील यांच्या गटाने केलेले वाढीव ९८२० सभासद अपात्र ठरविले व ४७०२ मतदारांना पात्र ठरविले आहे. आॅक्टोबरमध्ये निवडणुकीचा धुरळा उडण्याची चिन्हे आहेत.आताच्या राजकारणात तिथे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार दिनकरराव जाधव, विजय मोरे, संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे यांचे पॅनेल होणार हे नक्की आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री पाटील यांच्या तालुक्यातील हा कारखाना असल्याने त्यांना तिथे कोणत्याही स्थितीत भाजपचा सत्तेत शिरकाव हवा आहे. कदाचित पालकमंत्री पाटील हे आगामी विधानसभेला राधानगरी-भुदरगड या मतदारसंघातील उमेदवारही असू शकतात तशी चर्चाही विविध व्यासपीठांवरून अधून-मधून सुरू आहे. भाजपचे त्या तालुक्यात अजूनही म्हणावे तेवढे मजबूत संघटन नाही. त्यामुळे हा पक्ष स्वबळावर रिंगणात उतरू शकत नाही. त्या पक्षाच्या त्या मर्यादा आहेत. विरोधी आमदार आबिटकर यांच्याशीही पालकमंत्र्यांचे फारसे जमत नाही शिवाय संजय मंडलिक यांनाही सोबत घेणे ‘दादां’ना अडचणीचे आहे. कारण अगोदरच त्यांनी महाडिक गटाला राजकीय सोबतीला घेतले आहे. अशा स्थितीत ‘सोयीची युती’ म्हणून हा नवा घरोबा आकारास येत आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत कुणी कोणत्या पक्षाबरोबर युती करावी याला काय बंधन नसते, असेही कारण त्यासाठी पुरेसे आहेच.भाजपची राष्टÑवादीबरोबरआघाडी शक्यकागल तालुक्यातील समरजित घाटगे भाजपवासी झाल्यामुळे त्यांना काही जागा द्याव्याच लागतील. शिवाय गतनिवडणुकीत विरोधी असलेला माजी आमदार बजरंग देसाई यांचा मुलगाच राहुल सध्या भाजपमध्ये आहे. त्यामुळे सहा-सात जागा पदरात पाडून घेऊन भाजप तिथे राष्ट्रवादीसोबत आघाडी करू शकतो. या कारखान्याचा अध्यक्ष भाजप ठरवेल, असे पालकमंत्री पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सत्तेत जाऊन दादा दबावगट म्हणूनही कारखान्यावर नियंत्रण ठेवू शकतात.