शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

‘बिद्री’च्या चिमणीचा राजकीय धूर उडणार

By admin | Updated: January 14, 2015 23:34 IST

१४ हजार वाढीव सभासद : ‘बिद्री’ विरोधकांच्या विरोधाचा खुबीने राजकीय वापर; प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्यामार्फत चौकशी

दत्ता लोकरे - सरवडे - बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा - वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात सत्ताधारी मंडळींनी वाढीव केलेल्या सभासदांच्या विरोधात विरोधकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची सुनावणीही झाली; मात्र नवीन वाढीव सभासदांना विरोधकांनी केलेल्या विरोधाचा सत्ताधारी गटाने त्याचा उपयोग राजकारणासाठी खुबीने केल्याचे पाठविलेल्या पत्राने निदर्शनास आले.बिद्री साखर कारखान्यात सत्ताधारी विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांनी सुमारे १४ हजार वाढीव सभासद केले. त्यानंतर विरोधकांनी त्या वाढीव सभासदांची चौकशी व्हावी, यासंबंधी साखर सहसंचालक यांच्याकडे तक्रार केली. चौकशी सुरू होते तोच सत्ताधारी मंडळानेही विरोध दर्शविला. त्यावेळी साखर सहसंचालक कार्यालयात मोठा राडा झाला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. विधानसभा निवडणुकीत विरोधकांची एकी, आमदारांच्या कार्यपद्धतीवरील तसेच सरकारवरील नाराजी, बदलाचे वारे या सर्वांचा परिणाम झाला आणि प्रारंभी आमदार पाटील यांच्या विरोधात उमेदवार मिळत नसताना त्यांच्या शिष्याने, कामगारांच्या मुलाने ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या डोक्यात प्रकाश पाडत आत्मचिंतन करायला लावले.या निकालाने विरोधकांत उत्साह संचारला आणि आगामी येऊ घातलेल्या ‘बिद्री’च्या चिमणीचे डोहाळे सर्वांनाच लागले. विरोधकांनी उचल घेतली आणि बिद्रीने २५ जून २०१२ रोजीच्या संचालक मंडळ सभेत वाढीव सभासद मंजूर केलेल्या सभासदप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.सत्ताधारी गटाने हे वाढीव सभासद हे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्याचे म्हणत या सभासदांची कागदपत्रे ही खोटी व बोगस असल्याने त्याचे सभासदत्व रद्द करावे यासाठी विरोधक ‘बिद्री’चे माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव, आमदार प्रकाशराव आबिटकर, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी, कृष्णात पाटील, मधुकर देसाई यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला.दरम्यान, सत्ताधारी ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी वर विरोध करणाऱ्या सर्व विरोधी मंडळींची नावे घालून कारखान्यात नवीन करण्यात आलेल्या १४ हजार सभासदांना पत्रे पाठविली. त्यात म्हटले आहे की, आम्ही कायद्याच्या चौकटीत शासनाने निर्धारित केलेली प्रत्येक शेअरची रक्कम १०,००५/- भरून सभासद केले. मात्र, विरोधक ते रद्द व्हावेत, यासाठी न्यायालयात गेले. उच्च न्यायालयात दावा सुरू असून, सभासदत्व कायम राखण्यासाठी पिकविलेला सर्व ऊस कारखान्यास गळितास पाठविण्याचे आवाहन करून एकीकडे नवीन सभासदांची सहानुभूती तसेच विरोध करणाऱ्या संचालकां बद्दल घरातील अन्य सभासदांमध्ये सुद्धा नाराजी व्यक्त व्हावी, यासाठी एका दगडात दोन पक्षी मारून विरोधाचाही खुबीने राजकीय वापर करीत यशस्वी खेळी खेळली आहे. वाढीव सभासद प्रश्न ऐरणीवरवाढीव सभासदप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊन या सभासदांची प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणार असून, खऱ्या अर्थाने ‘बिद्री’च्या चिमणीचा राजकीय धूर उडणार आहे. मात्र, या सर्व घडामोडींकडे कारखाना कार्यक्षेत्रातील राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर तालुक्यांतील २१८ गावांतील सुमारे ७० हजार सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.