शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

‘बिद्री’च्या चिमणीचा राजकीय धूर उडणार

By admin | Updated: January 14, 2015 23:34 IST

१४ हजार वाढीव सभासद : ‘बिद्री’ विरोधकांच्या विरोधाचा खुबीने राजकीय वापर; प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्यामार्फत चौकशी

दत्ता लोकरे - सरवडे - बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा - वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात सत्ताधारी मंडळींनी वाढीव केलेल्या सभासदांच्या विरोधात विरोधकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची सुनावणीही झाली; मात्र नवीन वाढीव सभासदांना विरोधकांनी केलेल्या विरोधाचा सत्ताधारी गटाने त्याचा उपयोग राजकारणासाठी खुबीने केल्याचे पाठविलेल्या पत्राने निदर्शनास आले.बिद्री साखर कारखान्यात सत्ताधारी विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांनी सुमारे १४ हजार वाढीव सभासद केले. त्यानंतर विरोधकांनी त्या वाढीव सभासदांची चौकशी व्हावी, यासंबंधी साखर सहसंचालक यांच्याकडे तक्रार केली. चौकशी सुरू होते तोच सत्ताधारी मंडळानेही विरोध दर्शविला. त्यावेळी साखर सहसंचालक कार्यालयात मोठा राडा झाला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. विधानसभा निवडणुकीत विरोधकांची एकी, आमदारांच्या कार्यपद्धतीवरील तसेच सरकारवरील नाराजी, बदलाचे वारे या सर्वांचा परिणाम झाला आणि प्रारंभी आमदार पाटील यांच्या विरोधात उमेदवार मिळत नसताना त्यांच्या शिष्याने, कामगारांच्या मुलाने ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या डोक्यात प्रकाश पाडत आत्मचिंतन करायला लावले.या निकालाने विरोधकांत उत्साह संचारला आणि आगामी येऊ घातलेल्या ‘बिद्री’च्या चिमणीचे डोहाळे सर्वांनाच लागले. विरोधकांनी उचल घेतली आणि बिद्रीने २५ जून २०१२ रोजीच्या संचालक मंडळ सभेत वाढीव सभासद मंजूर केलेल्या सभासदप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.सत्ताधारी गटाने हे वाढीव सभासद हे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्याचे म्हणत या सभासदांची कागदपत्रे ही खोटी व बोगस असल्याने त्याचे सभासदत्व रद्द करावे यासाठी विरोधक ‘बिद्री’चे माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव, आमदार प्रकाशराव आबिटकर, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी, कृष्णात पाटील, मधुकर देसाई यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला.दरम्यान, सत्ताधारी ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी वर विरोध करणाऱ्या सर्व विरोधी मंडळींची नावे घालून कारखान्यात नवीन करण्यात आलेल्या १४ हजार सभासदांना पत्रे पाठविली. त्यात म्हटले आहे की, आम्ही कायद्याच्या चौकटीत शासनाने निर्धारित केलेली प्रत्येक शेअरची रक्कम १०,००५/- भरून सभासद केले. मात्र, विरोधक ते रद्द व्हावेत, यासाठी न्यायालयात गेले. उच्च न्यायालयात दावा सुरू असून, सभासदत्व कायम राखण्यासाठी पिकविलेला सर्व ऊस कारखान्यास गळितास पाठविण्याचे आवाहन करून एकीकडे नवीन सभासदांची सहानुभूती तसेच विरोध करणाऱ्या संचालकां बद्दल घरातील अन्य सभासदांमध्ये सुद्धा नाराजी व्यक्त व्हावी, यासाठी एका दगडात दोन पक्षी मारून विरोधाचाही खुबीने राजकीय वापर करीत यशस्वी खेळी खेळली आहे. वाढीव सभासद प्रश्न ऐरणीवरवाढीव सभासदप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊन या सभासदांची प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणार असून, खऱ्या अर्थाने ‘बिद्री’च्या चिमणीचा राजकीय धूर उडणार आहे. मात्र, या सर्व घडामोडींकडे कारखाना कार्यक्षेत्रातील राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर तालुक्यांतील २१८ गावांतील सुमारे ७० हजार सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.