शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आजऱ्यात ऊस तोडण्यासाठी २५०० रुपयांची मागितली जाते बिदागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST

* तालुक्यातील ८७ टक्के ऊस अद्याप शेतातच सदाशिव मोरे। आजरा आजरा साखर कारखान्याचे धुराडे सलग दुसऱ्या वर्षीही बंद राहणार ...

* तालुक्यातील ८७ टक्के ऊस अद्याप शेतातच

सदाशिव मोरे। आजरा

आजरा साखर कारखान्याचे धुराडे सलग दुसऱ्या वर्षीही बंद राहणार आहे. ऊस गाळपासाठी शेजारील कारखाने सुरू होऊन पावणेदोन महिले झाले. परंतु, तालुक्यातील ८० टक्के ऊस अद्यापही शेतातच आहे. तसेच ऊसतोड टोळ्यांकडून लोडला २५०० रुपयांची बिदागी घेतली जात असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे.

तालुक्यातील सर्वात जास्त क्षेत्र ऊस व भात पिकासाठी आहे. रासायनिक खताबरोबरच सेंद्रिय पद्धतीनेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. जवळपास २० ते ३० टक्के शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे. आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाकडून नवीन तंत्रज्ञान व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रबोधन केले जात आहे. कमी कष्टाचे पीक म्हणून ऊस पिकाकडे पाहिले जाते. परंतु, अतिवृष्टी व जंगली जनावरांच्या तावडीतून सुटलेले ऊस पीक गाळपासाठी कारखान्याकडे पाठविले जाते. गेली ९ ते १० वर्षे टस्कर हत्तींचा कळप ऊस पिकावर डल्ला मारत आहे.

आजरा कारखाना आर्थिक संकटात असल्याने गेली दोन वर्षे बंद आहे. कारखाना बंद असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. सध्या तांबाळे, हेमरस, दौलत, संताजी घोरपडे, बेडकीहाळ, शाहू कारखान्यांच्या टोळ्या ऊसतोड करीत आहेत. एप्रिल, मे महिन्यात पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने डिसेंबर, जानेवारीत ऊस पाठविण्याची शेतकऱ्यांची धडपड असते. पण, चालूवर्षी एका लोडला टोळीच्या मुकादमाला २५०० रुपये मोजावे लागत आहेत.

त्यातच तांबाळे वगळता अन्य कारखान्यांच्या टोळ्या ८ ते १० अशा आहेत. कारखाना चालू होईना व ऊस दुसरा कारखाना घेऊन जाईना, अशी विचित्र अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

-------------------------

* आजरा तालुक्यात अडीच ते पावणेतीन लाख टन ऊस उत्पादन होते. उसाला उताराही चांगला आहे. पण, सलग दोन वर्षे आजरा कारखाना बंद असल्याने उत्पादित ऊस घेऊन जाण्यास अन्य कारखाने टाळाटाळ करीत आहेत. पावणेदोन महिन्यात फक्त २० टक्के उसाची तोड झाली असून ८० टक्के ऊस शेतातच आहे.

* चालूवर्षी तालुक्यात झालेली अतिवृष्टी व जंगली जनावरांचा हैदोस यातून शिल्लक उसाचीही तोड करताना किंमत मोजावी लागत आहे. टस्कर हत्तींचा कळप गेली ९ ते १० वर्षे तालुक्यातच आहे. त्यांच्या त्रासामुळे शेतातील राखणही बंद झाली आहे. वाढलेले खतांचे दर व टोळींची मागणी यामुळे शेतकरी राजा उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.