शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘भाजीत भाजी अंबाडी, सरकार करतंय लबाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मानधन वाढीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी सोमवारपासून संप सुरू केला. राज्यभर आंदोलन सुरू झाले असून सोमवारी दुपारी हजारो कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. आक्रमक घोषणा देत या मदतनीस आणि सेविकांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला.कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्यावतीने दुपारी १२ वाजता मोर्चाला ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मानधन वाढीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी सोमवारपासून संप सुरू केला. राज्यभर आंदोलन सुरू झाले असून सोमवारी दुपारी हजारो कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. आक्रमक घोषणा देत या मदतनीस आणि सेविकांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला.कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्यावतीने दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. एकापेक्षा एक घोषणा देत मोर्चा दुपारी एकच्या सुमारास जिल्हा परिषदेवर धडकला. ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय’, ‘भाजीत भाजी अंबाडी, पंकजा मुंडे,सरकार करतंय लबाडी’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा,’ अशा घोषणा दिल्या.थोड्या वेळाने कॉ. सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली छाया तुप्पट, कुसूम पोवार, शोभा धुमाळ, संगीता पोवार, भारती पाटील, आशा तावरे, कल्पना पिलारे, सुनंदा किल्लेदार, उषा कांबळे, शुक्रा पाटील, कल्पना गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. डी. मोहिते यांची भेट घेतली. त्यांच्याशी यावेळी विविध मागण्यांबाबत चर्चा केली. या चर्चेचा तपशील आणि मंगळवारी मुंबई येथे होणाºया आझाद मैदानावरील आंदोलनाबाबतच्या सूचना दिल्यानंतर मोर्चा संपला.इतर राज्यांना जमतं तर महाराष्ट्राला का नाही?अंगणवाडी सेविका, मदतनिसांना मानधन वाढ करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर देशभरातील अनेक राज्यांनी मानधनात वाढ केली. मात्र, पुरोगामी आणि अग्रेसर म्हणवून घेणाºया महाराष्ट्राने मानधनवाढीचा निर्णय घेतला नाही. गेली वर्षभर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मार्गांनी आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची त्यांच्या गावी, विधान भवनामध्ये, मंत्रालयामध्ये भेटी घेण्यात आल्या. ३० मार्च २०१७ रोजी मुंडे यांनी विधान भवनात झालेल्या बैठकीत एक महिन्यात मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडून मंजूर करून घेऊन मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे त्यांनी संघटनांना आश्वासन दिले होते.२५ जुलैला आझाद मैदानात मोर्चेकºयांसमोर येऊन पुन्हा एक आठवड्याचे आश्वासन दिले होते; परंतु तेही त्यांनी न पाळल्याने एक महिन्यापूर्वी ‘बेमुदत बंद’ची नोटीस देण्यात आली होती.शासकीय कर्मचाºयांचा दर्जा, वेतनश्रेणी व अन्य लाभमिळावेत.मानधन वाढ करून ती १ एप्रिल २०१६ पासून लागू करावी.मानधन, प्रवास व बैठक भत्ता दर महिन्याला मिळावा.आहार अनुदान, इंधन भत्ता दर महिन्याला मिळावा.सादिलची रक्कम वाढवून६ हजार रुपये करावी. (मोबाईलवरून डाटा, फोटो पाठवावे लागतात. यासाठी नेट पॅक मारावा लागतो म्हणून.)आवश्यक नोंदवह्या शासनाने पुरवाव्यात.यासह अन्य १३ मागण्या करण्यात आल्या आहेत.