शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

भाई वैद्य यांना ‘शाहू’ पुरस्कार कोल्हापुरात शुक्रवारी वितरण

By admin | Updated: June 23, 2015 00:59 IST

गेल्या ७० वर्षांपासून सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या भाई वैद्य यांनी जातीव्यवस्था, सामाजिक अन्याय व विषमता, राजकीय दडपशाही व वंचितांवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष केला.

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना देण्यात येणार आहे. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. रोख रक्कम एक लाख रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंतचा हा तिसावा पुरस्कार आहे.शाहू महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच शुक्रवारी (दि.२६) संध्याकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील.गेल्या ७० वर्षांपासून सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या भाई वैद्य यांनी जातीव्यवस्था, सामाजिक अन्याय व विषमता, राजकीय दडपशाही व वंचितांवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. विद्यार्थीदशेतच १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत सहभाग घेतल्यानंतर ते १९४३ मध्ये राष्ट्रसेवा दलात सामील झाले. सामाजिक कार्यासाठी त्यांना १९६० मध्ये ‘युनेस्को’ची शिष्यवृत्ती मिळाली. या काळात त्यांनी गोवामुक्ती चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महागाईविरोधी चळवळीत भाग घेतला. ते १९६२ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी पक्षात सामील ते त्यांच्या फावडा, तुरुंग व मतपेटी या तत्त्वानुसार आचरण केले. या कालावधीत ते २५ वेळा तुरुंगात गेले. ते १९६२ ते ७७ या काळात महापालिकेचे सदस्य होते, १९७४-७५ मध्ये पुण्याचे महापौर होते. त्याचवर्षी ते अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष झाले. १९७८ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले त्याचवर्षी पुलोद सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. त्यानंतर ते जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर यांच्या भारत यात्रेत सामील झाले. राष्ट्रसेवा दल, समाजवादी जनपरिषद व भारत यात्रा ट्रस्टचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले व समाजप्रबोधनाचे कार्य चालू ठेवले. भार्इंना त्यांच्या कार्याबद्दल गोवा क्रांतीदिन पुरस्कार, मौलाना आझाद सद्भावना पुरस्कार, समता भूषण पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा विचार करून यावर्षीचा शाहू पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे. परिषदेस डॉ. अशोक चौसाळकर, पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते.यापूर्वीचे मानकरी...महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात या पुरस्काराला खूप मोलाचे स्थान आहे. आजपर्यंत हा पुरस्कार भाई माधवराव बागल, वि. वा. शिरवाडकर, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, प्रा. एन. डी. पाटील, आशा भोसले, मायावती, गोविंद पानसरे, प्राचार्य पी. बी. पाटील, शंकरराव खरात, आदी मान्यवरांना देण्यात आला आहे.