शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भाई वैद्य यांना ‘शाहू’ पुरस्कार कोल्हापुरात शुक्रवारी वितरण

By admin | Updated: June 23, 2015 00:59 IST

गेल्या ७० वर्षांपासून सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या भाई वैद्य यांनी जातीव्यवस्था, सामाजिक अन्याय व विषमता, राजकीय दडपशाही व वंचितांवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष केला.

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना देण्यात येणार आहे. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. रोख रक्कम एक लाख रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंतचा हा तिसावा पुरस्कार आहे.शाहू महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच शुक्रवारी (दि.२६) संध्याकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील.गेल्या ७० वर्षांपासून सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या भाई वैद्य यांनी जातीव्यवस्था, सामाजिक अन्याय व विषमता, राजकीय दडपशाही व वंचितांवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. विद्यार्थीदशेतच १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत सहभाग घेतल्यानंतर ते १९४३ मध्ये राष्ट्रसेवा दलात सामील झाले. सामाजिक कार्यासाठी त्यांना १९६० मध्ये ‘युनेस्को’ची शिष्यवृत्ती मिळाली. या काळात त्यांनी गोवामुक्ती चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महागाईविरोधी चळवळीत भाग घेतला. ते १९६२ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी पक्षात सामील ते त्यांच्या फावडा, तुरुंग व मतपेटी या तत्त्वानुसार आचरण केले. या कालावधीत ते २५ वेळा तुरुंगात गेले. ते १९६२ ते ७७ या काळात महापालिकेचे सदस्य होते, १९७४-७५ मध्ये पुण्याचे महापौर होते. त्याचवर्षी ते अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष झाले. १९७८ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले त्याचवर्षी पुलोद सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. त्यानंतर ते जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर यांच्या भारत यात्रेत सामील झाले. राष्ट्रसेवा दल, समाजवादी जनपरिषद व भारत यात्रा ट्रस्टचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले व समाजप्रबोधनाचे कार्य चालू ठेवले. भार्इंना त्यांच्या कार्याबद्दल गोवा क्रांतीदिन पुरस्कार, मौलाना आझाद सद्भावना पुरस्कार, समता भूषण पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा विचार करून यावर्षीचा शाहू पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे. परिषदेस डॉ. अशोक चौसाळकर, पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते.यापूर्वीचे मानकरी...महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात या पुरस्काराला खूप मोलाचे स्थान आहे. आजपर्यंत हा पुरस्कार भाई माधवराव बागल, वि. वा. शिरवाडकर, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, प्रा. एन. डी. पाटील, आशा भोसले, मायावती, गोविंद पानसरे, प्राचार्य पी. बी. पाटील, शंकरराव खरात, आदी मान्यवरांना देण्यात आला आहे.