शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

भाई वैद्य यांना ‘शाहू’ पुरस्कार कोल्हापुरात शुक्रवारी वितरण

By admin | Updated: June 23, 2015 00:59 IST

गेल्या ७० वर्षांपासून सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या भाई वैद्य यांनी जातीव्यवस्था, सामाजिक अन्याय व विषमता, राजकीय दडपशाही व वंचितांवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष केला.

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना देण्यात येणार आहे. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. रोख रक्कम एक लाख रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंतचा हा तिसावा पुरस्कार आहे.शाहू महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच शुक्रवारी (दि.२६) संध्याकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील.गेल्या ७० वर्षांपासून सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या भाई वैद्य यांनी जातीव्यवस्था, सामाजिक अन्याय व विषमता, राजकीय दडपशाही व वंचितांवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. विद्यार्थीदशेतच १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत सहभाग घेतल्यानंतर ते १९४३ मध्ये राष्ट्रसेवा दलात सामील झाले. सामाजिक कार्यासाठी त्यांना १९६० मध्ये ‘युनेस्को’ची शिष्यवृत्ती मिळाली. या काळात त्यांनी गोवामुक्ती चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महागाईविरोधी चळवळीत भाग घेतला. ते १९६२ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी पक्षात सामील ते त्यांच्या फावडा, तुरुंग व मतपेटी या तत्त्वानुसार आचरण केले. या कालावधीत ते २५ वेळा तुरुंगात गेले. ते १९६२ ते ७७ या काळात महापालिकेचे सदस्य होते, १९७४-७५ मध्ये पुण्याचे महापौर होते. त्याचवर्षी ते अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष झाले. १९७८ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले त्याचवर्षी पुलोद सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. त्यानंतर ते जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर यांच्या भारत यात्रेत सामील झाले. राष्ट्रसेवा दल, समाजवादी जनपरिषद व भारत यात्रा ट्रस्टचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले व समाजप्रबोधनाचे कार्य चालू ठेवले. भार्इंना त्यांच्या कार्याबद्दल गोवा क्रांतीदिन पुरस्कार, मौलाना आझाद सद्भावना पुरस्कार, समता भूषण पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा विचार करून यावर्षीचा शाहू पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे. परिषदेस डॉ. अशोक चौसाळकर, पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते.यापूर्वीचे मानकरी...महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात या पुरस्काराला खूप मोलाचे स्थान आहे. आजपर्यंत हा पुरस्कार भाई माधवराव बागल, वि. वा. शिरवाडकर, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, प्रा. एन. डी. पाटील, आशा भोसले, मायावती, गोविंद पानसरे, प्राचार्य पी. बी. पाटील, शंकरराव खरात, आदी मान्यवरांना देण्यात आला आहे.