शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान सुरू

By admin | Updated: February 4, 2015 00:41 IST

जिल्ह्यात अंमलबजावणीला सुरूवात : शिक्षण आणि आरोग्य विभागाकडून जागृती

कोल्हापूर : मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी केंद्र सरकारचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची अंमलबजावणी शहर आणि जिल्ह्यात ७ जानेवारीपासून केली जात आहे. पहिल्या टप्प्यात शिक्षण आणि आरोग्य विभाग संयुक्तपणे जागृतीवर भर देत आहे.केंद्र सरकारचे विभागीय प्रसिद्धी अधिकारी प्रमोद खंडागळे यांनी जिल्ह्यात सर्वांत कमी मुलींचा जन्मदर असलेल्या करवीर तालुक्यात प्रभावी जागृतीसाठी कार्यक्रम करण्यासंबंधीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार २३ फेब्रुवारीला करवीर तालुक्यातील सांगरूळ, तर २५ फेब्रुवारीला कसबा बीड येथे विशेष प्रचार मोहीम आणि कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत योजनांचीही माहिती दिली जाणार आहे. यानिमित्त शालेय व महाविद्यालयील विद्यार्थ्यांची जागृती फेरी निघणार आहे. लीड बँकेचे व्यवस्थापक मार्गदर्शन करतील.जिल्हा परिषद आरोग्य विभाग वाहनांवर चित्ररथ तयार करून गर्दीच्या ठिकाणी जागृती करत आहे. भीमा फेस्टिव्हलमध्येही ‘बेटी बचाओ’संबंधी संदेश देणारा हा चित्ररथ लक्षवेधी ठरला. आज, बुधवारपासून प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात होणाऱ्या विभागीय बचत गटांच्या प्रदर्शनात चित्ररथ थांबविण्यात येणार आहे. प्रत्येक प्राथमिक आणि उपकेंद्रात महिन्यातील स्त्री आणि पुरुष जन्मदराची संख्या दर्शनी भागावर लावली जात आहे. महसूल विभागाच्या मदतीने अभियान व्यापकपणे राबविले जात आहे. शिक्षण विभाग एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये याकडे विशेष लक्ष देत आहे. सर्व मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.