कबनूर : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी शेतमजुरांची मुलेदेखील गुणवत्ता यादीमध्ये येऊन स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. अशा विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम कबनूर एज्युकेशन सोसायटी प्रामाणिकपणे करीत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
कबनूर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे ते बोलत होते.
एनएमएमएस शिष्यवृत्ती पात्र यशस्वी विद्यार्थी कुमारी मिताली इंगळे मागासवर्गीय गुणवत्ता यादीमध्ये राज्यात प्रथम व महाराष्ट्र राज्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये नववी, अनुष्का शाळगांवकर ही जिल्हा विशेष मागासवर्ग यादीत जिल्ह्यात सातवी आली. तसेच आदित्य ठोंबरे, वैष्णवी कांबळे, पूर्वा कळ्ळी, आसावरी माने या विद्यार्थ्यांचा सत्कार राजू शेट्टी व अध्यक्ष पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केला.
मुख्याध्यापक एस. एन. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले, उपाध्यक्ष राजाराम वाकरेकर, सुभाष काडाप्पा, संचालक सुरेंद्र केटकाळे, महावीर केटकाळे, पार्वती पाटील, मुख्याध्यापिका के. यु. पोतदार, मुख्याध्यापक के. पी. कांबळे, एस. एस. नोरजे, एस. जी. उगारे उपस्थित होते. सूत्रसंचलन पी. के. मेटे यांनी केले. संजय चौगुले यांनी आभार मानले.
फोटो ओळी
२४०९२०२१-आयसीएच-०५
कबनूर हायस्कूलमधील एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार राजू शेट्टी यांनी केला. यावेळी पी. एम. पाटील, राजाराम वाकरेकर, सुभाष काडाप्पा, सुरेंद्र केटकाळे उपस्थित होते.