शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

‘खास’ मर्जीतल्यांनाच लाभ

By admin | Updated: November 18, 2014 23:34 IST

महात्मा फुले विकास महामंडळ : योजनांची यादी माहितीपत्रकापुरतीच

संदीप खवळे : कोल्हापूर ::मागासवर्गीय महामंडळांपैकी एक प्रमुख महामंडळ म्हणून ‘महात्मा फुले विकास महामंडळा’ची ओळख आहे. निधीचा पत्ता नाही, अवाजवी राजकीय हस्तक्षेप, एजंटांचा सुळसुळाट , वसुलीसाठी चकरा, अशा कात्रीत हे महामंडळ सापडले आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळाप्रमाणेच या महामंडळाकडील बहुतांशी योजना निधीअभावी माहितीपत्रकाची शोभा वाढविण्यासाठीच उरल्या आहेत. बीजभांडवल योजना आणि पन्नास टक्के अनुदान योजना या दोनच योजना महामंडळाकडे सुरू आहेत. त्यामुळे दोन सुरू आणी पन्नास योजना बंद अशीच कांहीशी स्थिती महामंडळाच्या कारभाराची झाली आहे. अनुसूचित जातीबरोबरच नवबौद्धांनाही या महामंडळातील योजनांमधून आर्थिक साहाय्य केले जाते. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ आणि महात्मा फुले विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांना ३१ मार्च २००८ च्या कर्जमाफीनंतर घरघर लागली आहे. निधी येईल तसा दिल्लीकडील योजना सुरू आहेत, पण इथे हातवशिला लागतो. पण ‘खास मर्जीतले’ अर्जदार सोडले तर एन.एफ.डी.सी.च्या योजना सुरू आहेत का बंद याचा थांगपत्ता लागत नाही, अशी लाभार्थ्यांची तक्रार आहे. महामंडळ आणि केंद्रीय महामंडळाच्या साहाय्याने राबविण्यात येणाऱ्या मुदती कर्ज योजना, महिला किसान योजना, सूक्ष्म पतपुरवठा आणि महिला समृद्धी योजना तसेच उच्च शैक्षणिक कर्ज योजनांचा उल्लेख माहितीपत्रकावर का करण्यात येतो, असा प्रश्न अनेक अर्जदार विचारत आहेत.पन्नास टक्के अनुदान योजनेची प्रकल्प मर्यादा पन्नास हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामध्ये दहा हजार रुपये अनुदान असते तर बीजभांडवल योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाते. त्यात ७५ टक्के कर्ज बँकेचे असते तर, २० टक्के बीजभांडवल कर्ज असते. या बीजभांडवल कर्जातच १० हजार रुपयांच्या अनुदानाचा समावेश असून पाच टक्के सहभाग अर्जदाराचा असतो. बीज भांडवल योजनेचे २०१३ मधील १६७ अर्ज प्रलंबित आहेत. बीज भांडवल योजनेचे सन २०१४ चे उद्दिष्ट २०० इतके आहे. यापैकी केवळ ६० प्रस्ताव मंजूर आहेत. अन्य महामंडळांप्रमाणे निधीच उपलब्ध नसल्यामुळे बीज भांडवलासह अनुदान योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. वसुलीचा मोठा फटका या महामंडळास बसत आहे. वसुली वेळेवर झाल्यास बीज भांडवल कर्जासाठी बँकांकडून अडवणूक होणार नाही. बीज भांडवल आणि पन्नास टक्के योजनांवरच भार असल्यामुळे या योजना पूर्ण क्षमतेने चालू होण्यासाठी या महामंडळाला बँकांप्रमाणेच पूर्वीच्या कर्जदारांकडूनही सहकार्य होणे खूप महत्त्वाचे आहे. पण बीज भांडवल योजनेसाठी जामिनाची अट असल्यामुळे, बऱ्याचदा गरजूंना लाभ होत नसल्याचे चित्र आहे. त्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रकल्प कर्जही मिळणे मुश्कील होत आहे.महामंडळाचा ‘कारभार’महामंडळाची स्थापना कंपनी कायदा अधिनियम १९५६ अन्वये १० जुलै १९७८अधिकृत भागभांडवल५०० कोटी रुपये भागभांडवलातील हिस्सा : राज्य शासन : ५१ टक्के, केंद्र सरकार - ४९ टक्के अनुसूचित जातीसह नवबौद्ध अर्जदारांना अर्थसाहाय्य