शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

‘खास’ मर्जीतल्यांनाच लाभ

By admin | Updated: November 18, 2014 23:34 IST

महात्मा फुले विकास महामंडळ : योजनांची यादी माहितीपत्रकापुरतीच

संदीप खवळे : कोल्हापूर ::मागासवर्गीय महामंडळांपैकी एक प्रमुख महामंडळ म्हणून ‘महात्मा फुले विकास महामंडळा’ची ओळख आहे. निधीचा पत्ता नाही, अवाजवी राजकीय हस्तक्षेप, एजंटांचा सुळसुळाट , वसुलीसाठी चकरा, अशा कात्रीत हे महामंडळ सापडले आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळाप्रमाणेच या महामंडळाकडील बहुतांशी योजना निधीअभावी माहितीपत्रकाची शोभा वाढविण्यासाठीच उरल्या आहेत. बीजभांडवल योजना आणि पन्नास टक्के अनुदान योजना या दोनच योजना महामंडळाकडे सुरू आहेत. त्यामुळे दोन सुरू आणी पन्नास योजना बंद अशीच कांहीशी स्थिती महामंडळाच्या कारभाराची झाली आहे. अनुसूचित जातीबरोबरच नवबौद्धांनाही या महामंडळातील योजनांमधून आर्थिक साहाय्य केले जाते. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ आणि महात्मा फुले विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांना ३१ मार्च २००८ च्या कर्जमाफीनंतर घरघर लागली आहे. निधी येईल तसा दिल्लीकडील योजना सुरू आहेत, पण इथे हातवशिला लागतो. पण ‘खास मर्जीतले’ अर्जदार सोडले तर एन.एफ.डी.सी.च्या योजना सुरू आहेत का बंद याचा थांगपत्ता लागत नाही, अशी लाभार्थ्यांची तक्रार आहे. महामंडळ आणि केंद्रीय महामंडळाच्या साहाय्याने राबविण्यात येणाऱ्या मुदती कर्ज योजना, महिला किसान योजना, सूक्ष्म पतपुरवठा आणि महिला समृद्धी योजना तसेच उच्च शैक्षणिक कर्ज योजनांचा उल्लेख माहितीपत्रकावर का करण्यात येतो, असा प्रश्न अनेक अर्जदार विचारत आहेत.पन्नास टक्के अनुदान योजनेची प्रकल्प मर्यादा पन्नास हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामध्ये दहा हजार रुपये अनुदान असते तर बीजभांडवल योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाते. त्यात ७५ टक्के कर्ज बँकेचे असते तर, २० टक्के बीजभांडवल कर्ज असते. या बीजभांडवल कर्जातच १० हजार रुपयांच्या अनुदानाचा समावेश असून पाच टक्के सहभाग अर्जदाराचा असतो. बीज भांडवल योजनेचे २०१३ मधील १६७ अर्ज प्रलंबित आहेत. बीज भांडवल योजनेचे सन २०१४ चे उद्दिष्ट २०० इतके आहे. यापैकी केवळ ६० प्रस्ताव मंजूर आहेत. अन्य महामंडळांप्रमाणे निधीच उपलब्ध नसल्यामुळे बीज भांडवलासह अनुदान योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. वसुलीचा मोठा फटका या महामंडळास बसत आहे. वसुली वेळेवर झाल्यास बीज भांडवल कर्जासाठी बँकांकडून अडवणूक होणार नाही. बीज भांडवल आणि पन्नास टक्के योजनांवरच भार असल्यामुळे या योजना पूर्ण क्षमतेने चालू होण्यासाठी या महामंडळाला बँकांप्रमाणेच पूर्वीच्या कर्जदारांकडूनही सहकार्य होणे खूप महत्त्वाचे आहे. पण बीज भांडवल योजनेसाठी जामिनाची अट असल्यामुळे, बऱ्याचदा गरजूंना लाभ होत नसल्याचे चित्र आहे. त्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रकल्प कर्जही मिळणे मुश्कील होत आहे.महामंडळाचा ‘कारभार’महामंडळाची स्थापना कंपनी कायदा अधिनियम १९५६ अन्वये १० जुलै १९७८अधिकृत भागभांडवल५०० कोटी रुपये भागभांडवलातील हिस्सा : राज्य शासन : ५१ टक्के, केंद्र सरकार - ४९ टक्के अनुसूचित जातीसह नवबौद्ध अर्जदारांना अर्थसाहाय्य