शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बेळगावच्या मोर्चाला कोल्हापूरकर जाणार

By admin | Updated: February 13, 2017 00:20 IST

महापौरांचे सहभागी होण्याचे आश्वासन : क्रांती मोर्चाच्या निमंत्रकांनी घेतल्या शहरातील नेत्यांच्या भेटी

कोल्हापूर : बेळगाव येथे होणाऱ्या सकल मराठा व मराठी मूक मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातूनही सकल मराठा समाजाच्या वतीने सहभागी व्हावे यासाठी मोर्चाच्या निमंत्रकांनी रविवारी कोल्हापुरात शाहू छत्रपती, महापौर हसिना फरास, खासदार संभाजीराजे, आदी नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना आवाहन केले. या मोर्चात कार्यकर्त्यांसह आपण स्वत: मोर्चात सहभागी होणार असल्याचे महापौर हसिना फरास यांनी आश्वासन दिले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील, असे आश्वासन यावेळी नेत्यांनी दिले.सकल मराठा व मराठी समाजाच्या वतीने बेळगाव येथे १६ फेब्रुवारी रोजी क्रांती मूक मोर्चा निघणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू असून, मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा पोटशूळ उठल्याने कर्नाटक प्रशासनाने या मोर्चाला गालबोट लावण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. बेळगाव येथील प्रशासन विविध कारणांनी अनेक अडचणी उभ्या करून रोज नवीन प्रश्न निर्माण करून मोर्चाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या मोर्चाला विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातून, सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी सीमावासीयांची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर या मोर्चाचे निमंत्रक, बेळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. अमर यळ्ळूरकर, नेताजी जाधव, महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य व निपाणीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, मोर्चाचे जनसंपर्क अधिकारी विकास कलघटकी यांनी रविवारी शाहू छत्रपती यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी, कोल्हापूरचे पालकमंत्री आणि सीमावादाबाबतचे महाराष्ट्र शासनाचे समन्वयक चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्नाटक शासनाच्या दडपशाहीबाबत केंद्राला भूमिका कळवावी, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी शाहू छत्रपती यांनी याबाबत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी फोन करून चर्चा केली. या शिष्टमंडळाने खासदार संभाजीराजे यांचीही भेट घेऊन त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. त्यांनीही मोर्चात कार्यकर्ते सहभागी होतील; तसेच आपणही या मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. महापौर हसिना फरास यांचीही या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. कोल्हापूर शहरातील जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगरसेविका व कार्यकर्त्यांसह आपण स्वत: या मोर्चात सहभागी होऊ, असेही आश्वासन महापौर फरास यांनी दिले. (प्रतिनिधी)सीमावासीयांची इच्छामोर्चाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा पोटशूळ उठल्याने कर्नाटक प्रशासनाने या मोर्चाला गालबोट लावण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. बेळगाव येथील प्रशासन विविध कारणांनी अनेक अडचणी उभ्या करून रोज नवीन प्रश्न निर्माण करून मोर्चाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या मोर्चाला विशेषत: कोल्हापूर जिल्ह्णातून, सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी सीमावासीयांची इच्छा आहे.