शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव येथे कारची ट्रकला धडक; औरंगाबादचे सात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:41 IST

बेळगाव : भरधाव कारचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात औरंगाबादचे सात तरुण ...

बेळगाव : भरधाव कारचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात औरंगाबादचे सात तरुण ठार झाले. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बेळगाव शहराजवळील महामार्गावर, श्रीनगर गार्डनजवळ हा अपघात घडला. हे सर्व तरुण गोव्याकडे जात होते.नंदू किशनराव पवार (वय २८), अमोल निले (२६), सुरेश कन्हेरे (२९), अमोल रमेश चावरे (२६), महेश चावरे (२८), महेश नंदू कडाले, गोपीनाथ कडोबा वरकड (वय २७) (सर्वजण रा. औरंगाबाद) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.ट्रकने जोराची धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला होता. कारमधील पाच तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत महेश कडाले व गोपीनाथ वरकड या दोघांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.औरंगाबादहून कारमधून सात तरुण गोव्याकडे निघाले होते. रविवारी सकाळी या सर्वांनी कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर हे सर्वजण बेळगावमार्गे गोव्याला जात होते. त्यांची कार बेळगाव येथील श्रीनगर गार्डनजवळ आली तेव्हा कारचा समोरील टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजकावरून पलीकडील रस्त्यावर गेली. यावेळी धारवाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. ही धडक भीषण असल्याने कारमधील पाच जण जागीच ठार झाले. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्या दोघांचाही ही मृत्यू झाला.