शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

पूरग्रस्त गावाकडे परतू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

संदीप बावचे : लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : पुराचे पाणी ओसरू लागल्याने स्थलांतरित पूरग्रस्त आता गावाकडे परतू लागले ...

संदीप बावचे :

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरोळ : पुराचे पाणी ओसरू लागल्याने स्थलांतरित पूरग्रस्त आता गावाकडे परतू लागले आहेत. मात्र, महापुराच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेला संसार कसा उभारायचा, महापुराने झालेले मोठे नुकसान कसे भरुन निघणार, असे प्रश्न घेऊन पुन्हा संसार उभा करण्यासाठी जड अंत:करणाने पूरग्रस्त गावाकडे येत आहेत.

महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. ऊस, भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात ५५ गावे असून, यापैकी ४३ गावांना महापुराचा फटका बसला आहे. यात २४ गावांचा संपर्क तुटून १३ गावे पाण्याखाली गेली तर ७९ हजार पूरग्रस्तांनी स्थलांतर केले होते.

महापुराचे पाणी शुक्रवार (दि. २३)पासून वाढू लागले तसे चिंचवाडपासून खिद्रापूरपर्यंतच्या गावातील पूरग्रस्त स्थलांतरित होऊ लागले. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वेळीच ग्रामस्थ स्थलातंरित झाले. पै-पाहुणे, नातेवाईक यांच्याकडे साठ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी आश्रय घेतला तर ४४ छावण्यांमध्ये १५ हजारहून अधिक पूरग्रस्त वास्तव्याला आले. काहींनी भाड्याची घरेदेखील शोधली. मागील अनुभव पाहता यावेळच्या पुरामध्ये पूरग्रस्तांनी जास्तीत जास्त जनावरे गावाबाहेर काढल्याचे चित्र पाहायला मिळाले. ३० हजारहून अधिक जनावरे सुरक्षितस्थळी हलविण्यात आली. दरम्यान, पूर ओसरत असल्याने पूरग्रस्त गावाकडे परतत आहेत तर काही पूरग्रस्त छावणी व नातेवाईकांकडे वास्तव्याला आहेत. मात्र, शुक्रवारी सायंकाळनंतर झालेल्या पावसामुळे पूरग्रस्तांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे.

चौकट.. दु:ख सावरत उभारी

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने मोठे नुकसान केले. त्यातच पुन्हा एकदा महापुराने होत्याचे नव्हते केले आहे. कष्टाने पिकवलेली शेती, संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दुःखाला पारावरच राहिला नाही. हे दुःख विसरुन नव्या जोमाने सावरण्याचा प्रयत्न पूरग्रस्त करत आहेत.

फोटो ओळ : औरवाड (ता. शिरोळ) येथून नृसिंहवाडीकडे पुराच्या पाण्यातून मार्ग काढत वयोवृध्द आजी-आजोबांनी प्रवास केला. (छाया : सुभाष गुरव)