शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

पूरग्रस्त गावाकडे परतू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

संदीप बावचे : लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : पुराचे पाणी ओसरू लागल्याने स्थलांतरित पूरग्रस्त आता गावाकडे परतू लागले ...

संदीप बावचे :

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरोळ : पुराचे पाणी ओसरू लागल्याने स्थलांतरित पूरग्रस्त आता गावाकडे परतू लागले आहेत. मात्र, महापुराच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेला संसार कसा उभारायचा, महापुराने झालेले मोठे नुकसान कसे भरुन निघणार, असे प्रश्न घेऊन पुन्हा संसार उभा करण्यासाठी जड अंत:करणाने पूरग्रस्त गावाकडे येत आहेत.

महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. ऊस, भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात ५५ गावे असून, यापैकी ४३ गावांना महापुराचा फटका बसला आहे. यात २४ गावांचा संपर्क तुटून १३ गावे पाण्याखाली गेली तर ७९ हजार पूरग्रस्तांनी स्थलांतर केले होते.

महापुराचे पाणी शुक्रवार (दि. २३)पासून वाढू लागले तसे चिंचवाडपासून खिद्रापूरपर्यंतच्या गावातील पूरग्रस्त स्थलांतरित होऊ लागले. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वेळीच ग्रामस्थ स्थलातंरित झाले. पै-पाहुणे, नातेवाईक यांच्याकडे साठ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी आश्रय घेतला तर ४४ छावण्यांमध्ये १५ हजारहून अधिक पूरग्रस्त वास्तव्याला आले. काहींनी भाड्याची घरेदेखील शोधली. मागील अनुभव पाहता यावेळच्या पुरामध्ये पूरग्रस्तांनी जास्तीत जास्त जनावरे गावाबाहेर काढल्याचे चित्र पाहायला मिळाले. ३० हजारहून अधिक जनावरे सुरक्षितस्थळी हलविण्यात आली. दरम्यान, पूर ओसरत असल्याने पूरग्रस्त गावाकडे परतत आहेत तर काही पूरग्रस्त छावणी व नातेवाईकांकडे वास्तव्याला आहेत. मात्र, शुक्रवारी सायंकाळनंतर झालेल्या पावसामुळे पूरग्रस्तांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे.

चौकट.. दु:ख सावरत उभारी

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने मोठे नुकसान केले. त्यातच पुन्हा एकदा महापुराने होत्याचे नव्हते केले आहे. कष्टाने पिकवलेली शेती, संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दुःखाला पारावरच राहिला नाही. हे दुःख विसरुन नव्या जोमाने सावरण्याचा प्रयत्न पूरग्रस्त करत आहेत.

फोटो ओळ : औरवाड (ता. शिरोळ) येथून नृसिंहवाडीकडे पुराच्या पाण्यातून मार्ग काढत वयोवृध्द आजी-आजोबांनी प्रवास केला. (छाया : सुभाष गुरव)